अ‍ॅपशहर

लॉकडाऊन: २ महिने पाणीपट्टी माफ; नगरच्या 'या' ग्रामपंचायतीचा निर्णय

लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्यानं आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना नगर जिल्ह्यातील लोहसर ग्रामपंचायतीनं दिलासा दिला आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे पाणी बिल माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनं घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2020, 6:44 pm
अहमदनगर: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील लोहसर ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांची पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनं घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water bill


देशभरात सध्या लॉकडाऊन आहे. या काळात सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात लोहसर ग्रामपंचायतीने नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीने एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतील साधारण ५० हजार रुपये पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीनं मार्च महिन्यातील पाणीपट्टी शंभर टक्के वसूल केली आहे. त्यांनतर पुढील दोन महिन्यांची पाणीपट्टी मात्र माफ करण्यात आली आहे. पाणीपट्टी माफ करणारी लोहसर ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. त्यामुळे राज्यातील अन्य ग्रामपंचायतींनी सुद्धा असा निर्णय घ्यावा, असे आवाहन लोहसर ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल गिते यांनी केले आहे.

११७ वाढले; राज्यातील करोना रुग्णांची संख्या २८०० पार


'करोना'चा धडाः मर्यादेचे 'लॉक', अपेक्षा 'डाऊन'

नवी मुंबई पोलिसांसाठी सॅनिटायझेशन व्हॅन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज