अ‍ॅपशहर

hasan mushrif : मंदिर बांधण्यासाठी वातावरण मंगलमय नाही; 'या' नेत्याने केलं पवारांचं समर्थन

'शरद पवार (sharad pawar) यांनी सोलापूर येथील दौऱ्यात राम मंदिराबाबत टिप्पणी केली होती. त्यात त्यांनी सध्याचे वातावरण मंगलमय नसल्याचं सांगितलं, असं सांगतानाच आपण एखादे देऊळ बांधतो, तेव्हा वातावरण प्रसन्न पाहिजे. आज परिस्थिती तशी नाही, ' असे मत नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी आज व्यक्त केले. राममंदिर हा अस्मितेचा प्रश्न आहे, त्याला विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Authored byसंदीप कुलकर्णी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2020, 2:30 pm
नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राम मंदिरावर केलेल्या वक्तव्याचं नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी समर्थन केलं आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. तो सर्वांनी मान्य केला आहे. पण सध्या करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने परिस्थिती खराब झालेली आहे. वातावरण मंगलमय नाही. आपण एखादे देऊळ बांधतो तेव्हा वातावरण प्रसन्न पाहिजे, पण आज ती परिस्थिती नाही. पवारांनाही तेच म्हणायचे होते, असं सांगत हसन मुश्रीफ यांनी पवारांचं समर्थन केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ram mandir


हसन मुश्रीफ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राममंदिर हा अस्मितेचा प्रश्न आहे. त्याला विरोध नाही. फक्त कोणत्या परिस्थितीत कोणतं कार्य केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. बरं प्राधान्य कशाला द्यावं हे पवारांनी सांगितलं तेच शंकराचार्यांनीही सांगितलं. त्यांनी राम मंदिराचा मुहूर्त शुभ नसल्याचं म्हटलं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शरद पवार यांनी सोलापूर येथील दौऱ्यात राम मंदिराबाबत टिप्पणी केली होती. तुम्ही त्यांची प्रतिक्रिया ऐकली असेलच. त्यात त्यांनी प्राधान्य कशाला द्यायचं यावर भाष्य केलं आहे. त्यात काही वावगं नाही. कारण सध्याचे वातावरण हे मंगलमय नाही. सध्या रोज पन्नास हजार पेशंट सापडत आहेत. एखाद्या देवाचे मंदिर बांधणी करताना वातावरण चांगले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. राम मंदिर बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आपण सर्वांनी मान्य केलेला आहे. त्यावेळी त्याचे स्वागत पवारांनीही केले होते. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या निर्णयाचे स्वागत केले होते. राहुल गांधी यांनीही स्वागत केले असून त्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण मंदिराच्या भूमिपूजनासाठी ही वेळ योग्य नाही. मात्र भाजपने निषेध म्हणून पवारांना पत्रं पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून राष्ट्रवादी युवकने पत्रे पाठवा मोहीम हाती घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं.


राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जावं की जाऊ नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं सांगत मुश्रीफ यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच मी आणि विक्रम घाडगे यांनी स्वतः कागल येथे १५ कोटी रुपये खर्च करून रामाचे सुंदर मंदिर बांधलं आहे, असं सांगतानाच माझा जन्मच रामनवमीचा आहे, असेही ते म्हणााले.

sharad pawar : 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्र पाठवणार

udayanraje bhosale : ... तर शिवसेनेचं नामांतर 'ठाकरे सेना' करा; उदयनराजेंची टीका

दरम्यान, राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांचा राष्ट्रवादीने काल काही ठिकाणी निषेध केला. त्यावरही मुश्रीफ यांनी भाष्य केलं. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ते जय भवानी, जय शिवाजी बोलले. त्यावर नायडू यांनी हे सभागृह आहे, असे सांगितले. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी मुश्रीफ यांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करोना अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार डॉ. सुजय विखे , आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आदी उपस्थित होते.

३१ जुलैनंतर लॉकडाऊन उठणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज