अ‍ॅपशहर

महावितरणची कामे करणार ग्रामपंचायती

गावात विजेच्या बिलांचे वाटप करणे, किरकोळ दुरुस्ती, खराब झाल्यास बल्ब बदलणे, मीटरचे रीडिंग घेणे यांसारखी किरकोळ कामे आता ग्रामपंचायती करणार आहेत.

Maharashtra Times 28 Oct 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahavitaran works
महावितरणची कामे करणार ग्रामपंचायती


गावात विजेच्या बिलांचे वाटप करणे, किरकोळ दुरुस्ती, खराब झाल्यास बल्ब बदलणे, मीटरचे रीडिंग घेणे यांसारखी किरकोळ कामे आता ग्रामपंचायती करणार आहेत. या कामांसाठी ग्रामपंचायती मानधनावर ग्राम विद्युत व्ववस्थापकाची नेमणूक करणार आहेत. या कामासाठी ग्रामपंचायतींना फ्रेंचायझी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात महावितरणच्या सेवा झटपट देणे आता शक्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ग्रामीण भागात महावितरणने विद्युत कर्मचारी नियुक्त केले आहेत. एका कर्मचाऱ्याकडे दहा ते बारा गावांचा कार्यभार दिलेला असतो. या गावात विजेबाबत काही समस्या उद्भवल्यास, तसेच महावितरणच्या सेवा देण्याचे काम केले जाते. असे असले तरी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक गावात वेळेत सेवा देणे शक्य होत नाही. त्यामुळे या पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. महावितरणच्या सेवा गावात झटपट उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ग्रामपंचायतींकडून काही कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांना दर महिन्यास ठराविक मानधन दिले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना ग्राम विद्यूत व्यवस्थापक या नावाने संबोधले जाईल. कर्मचारी नियुक्त केल्यानंतर त्यांना कामाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांकडे किमान आयटीआय किंवा इलेक्ट्रिकल या विषयात शिक्षण आवश्यक राहणार आहे.

ही कामे करणार

गावातील ग्राम विद्युत व्यवस्थापक घरांतील मीटरचे रीडिंग घेणे, वीज बिलांचे वाटप करणे, वीजपुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत करणे, फ्यूजबाबत तक्रारी सोडवणे, रस्त्यावरील दिव्यांची देखभाल करणे, नादुरुस्त दिवे बदलणे, नवीन वीज जोडणीची कामे करणे, थकबाकी असल्यास वीज कनेक्शन तोडणे आदी कामे करणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज