म. टा. प्रतिनिधी, नगर
महापालिकेच्या पाणी योजनेचे वीजबिल थकल्याने नव्या वर्षाच्या प्रारंभालाच शहर वासियांवर पाणी टंचाईची टांगती तलवार दिसू लागली आहे. महावितरणने नव्याने महापालिकेला नोटीस दिली आहे. अर्थात ही नोटीस २० डिसेंबरला दिली असून, ती टपालाने मनपापर्यंत सात दिवसांनी पोचली आहे. २४ तासांत पैसे भरले नाहीत तर पाणी योजनेची वीज तोडण्याचा इशारा या नोटिशीद्वारे दिला गेला असल्याने पाणी योजनेची वीज कधीही खंडित होण्याची शक्यता आहे.
नगर शहराला मुळा धरणातून म्हणजे सुमारे ४० किमी अंतरावरून पिण्याचे पाणी येते. नगर शहर काहीसे उंचावर असल्याने तीन ठिकाणी वीज मोटारीद्वारे पाणी लिफ्ट केले जाते. मुळा धरण, विळद जलशुद्धीकरण केंद्र व नागापूर उपकेंद्रामध्ये यासाठी तीन वीजजोड आहेत. या तिन्ही जोडांचे मिळून १६० कोटी ६१ लाखांचे वीजबिल थकले आहे. यात चालू वीजबिल सुमारे १२ कोटी ६० लाखांचे आहे. या बिलापोटी महापालिकेने आतापर्यंत केवळ ४ कोटी ५ लाख रुपयेच जमा केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामुळे किमान चालू वीजबिलाचे राहिलेले ८ कोटी तसेच मागील थकबाकीचे सुमारे दीडशे कोटी रुपये भरले नाही तर पाणी योजनेची वीज तोडण्याची नोटीस पुन्हा महापालिकेला दिली गेली आहे.
चौकट ः
तब्बल २२ नोटिसा
पाणी योजनेच्या थकित वीजबिल वसुलीसाठी महावितरणने मागील दोन वर्षांत महापालिकेला तब्बल २२ नोटिसा दिल्या आहेत. २० नोव्हेंबर २०१५ पासून २४ नोव्हेंबर २०१७ पर्यंतच्या या नोटिसा आहेत व आता नुकतीच २० डिसेंबरला २३ वी नोटीस दिली आहे. या नोटिशींच्या प्रती पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप व महापौर सुरेखा कदम यांनाही देण्यात आल्या आहेत.
चौकट ः
आयुक्त रजेवर
महावितरणने महापालिकेला नव्याने पाण्याची वीज तोडण्याचा इशारा देणारी नोटीस जारी केली असली तरी आयुक्त घनश्याम मंगळे हे आजारपणाच्या रजेवर असल्याने मनपा प्रशासनासमोर पैशांच्या जमवाजमवीचे आव्हान आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली कमी होत असताना महावितरणच्या पैशांचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
महापालिकेच्या पाणी योजनेचे वीजबिल थकल्याने नव्या वर्षाच्या प्रारंभालाच शहर वासियांवर पाणी टंचाईची टांगती तलवार दिसू लागली आहे. महावितरणने नव्याने महापालिकेला नोटीस दिली आहे. अर्थात ही नोटीस २० डिसेंबरला दिली असून, ती टपालाने मनपापर्यंत सात दिवसांनी पोचली आहे. २४ तासांत पैसे भरले नाहीत तर पाणी योजनेची वीज तोडण्याचा इशारा या नोटिशीद्वारे दिला गेला असल्याने पाणी योजनेची वीज कधीही खंडित होण्याची शक्यता आहे.
नगर शहराला मुळा धरणातून म्हणजे सुमारे ४० किमी अंतरावरून पिण्याचे पाणी येते. नगर शहर काहीसे उंचावर असल्याने तीन ठिकाणी वीज मोटारीद्वारे पाणी लिफ्ट केले जाते. मुळा धरण, विळद जलशुद्धीकरण केंद्र व नागापूर उपकेंद्रामध्ये यासाठी तीन वीजजोड आहेत. या तिन्ही जोडांचे मिळून १६० कोटी ६१ लाखांचे वीजबिल थकले आहे. यात चालू वीजबिल सुमारे १२ कोटी ६० लाखांचे आहे. या बिलापोटी महापालिकेने आतापर्यंत केवळ ४ कोटी ५ लाख रुपयेच जमा केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामुळे किमान चालू वीजबिलाचे राहिलेले ८ कोटी तसेच मागील थकबाकीचे सुमारे दीडशे कोटी रुपये भरले नाही तर पाणी योजनेची वीज तोडण्याची नोटीस पुन्हा महापालिकेला दिली गेली आहे.
चौकट ः
तब्बल २२ नोटिसा
पाणी योजनेच्या थकित वीजबिल वसुलीसाठी महावितरणने मागील दोन वर्षांत महापालिकेला तब्बल २२ नोटिसा दिल्या आहेत. २० नोव्हेंबर २०१५ पासून २४ नोव्हेंबर २०१७ पर्यंतच्या या नोटिसा आहेत व आता नुकतीच २० डिसेंबरला २३ वी नोटीस दिली आहे. या नोटिशींच्या प्रती पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप व महापौर सुरेखा कदम यांनाही देण्यात आल्या आहेत.
चौकट ः
आयुक्त रजेवर
महावितरणने महापालिकेला नव्याने पाण्याची वीज तोडण्याचा इशारा देणारी नोटीस जारी केली असली तरी आयुक्त घनश्याम मंगळे हे आजारपणाच्या रजेवर असल्याने मनपा प्रशासनासमोर पैशांच्या जमवाजमवीचे आव्हान आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली कमी होत असताना महावितरणच्या पैशांचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.