अ‍ॅपशहर

‘माझी कन्या...’चा गोंधळ कायम

स्त्रीभ्रुण-हत्या रोखण्याबरोबरच मुलींचा घटत जाणारा जन्मदर सुधारण्यासाठी मागील वर्षातील फेब्रुवारी महिन्यात मोठ्या थाटात सुरू करण्यात आलेली ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही.

Maharashtra Times 10 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mazi kanya scheme
‘माझी कन्या...’चा गोंधळ कायम


स्त्रीभ्रुण-हत्या रोखण्याबरोबरच मुलींचा घटत जाणारा जन्मदर सुधारण्यासाठी मागील वर्षातील फेब्रुवारी महिन्यात मोठ्या थाटात सुरू करण्यात आलेली ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. या योजनेत अनेक त्रुटी असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडून याबाबत स्पष्टता नसल्याने कार्यवाही ठप्प झाली आहे. योजना कशा पद्धतीने राबवायची याबाबत निर्माण झालेला गोंधळ अजूनही कायम असून प्रकल्पस्तरावर लाभार्थींच्या नुसत्याच नोंदी घेतल्या जात आहेत.

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी राज्य सरकारने २०१४ मध्ये ‘सुकन्या योजना’ सुरू केली. या योजनेस जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. योजनेबाबत नागरिकांना फारशी माहिती नसल्याने अधिकाऱ्यांनाच घरोघर जाऊन प्रस्ताव गोळा करावे लागले. दोन वर्षांनंतर या योजनेत पुन्हा बदल करण्यात येऊन फेब्रुवारी २०१६ मध्ये माझी कन्या भाग्यश्री या नावाने नवी योजना सुरू करण्यात आली. आधीच्या योजनेत मिळणारे लाभ कायम ठेवण्यात येऊन काही नवीन लाभ निश्चित करण्यात आले. मुलींचा जन्म झाल्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यात अशी कुटुंबे कशी शोधायची, त्यांच्या कागदपत्रांचे काय, दारिद्र्यरेषेवरील कुटुंबांनाही लाभ देण्याचे सांगितले असले तरी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले नसल्यामुळे अधिकाऱ्यांना कार्यवाही करता आली नाही. योजनेतील अडचणींच्या मुद्द्यांबाबत स्पष्टता नसल्याने कार्यवाही ठप्प झाली आहे. सरकारकडून सूचना दिल्या गेल्या असल्या तरी या सूचनांबाबत

आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रकल्पस्तरावर लाभार्थींच्या नोंदी घेण्याचेच काम सुरू आहे. दरम्यान, या पूर्वीची सुकन्या योजनेत या नव्या योजनेत समाविष्ट केली असल्याने या योजनेचे लाभ दिले जात असल्याचे सांगण्यात आले.

मुलगी झाल्यानंतर मुलगा होण्याची वाट न पाहता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीच्या नावे बँकेत मुदत ठेव सुरू करण्याची योजनाही जिल्हा परिषदेस सुरू करता आली नाही. या योजनेच्या प्रस्तावास सरकारकडून मंजुरी मिळाली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज