अ‍ॅपशहर

केजरीवाल फक्त बोलतात: अण्णा

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं आहे. 'केजरीवाल फक्त बोलतात, त्यांची कृती शून्य आहे,' अशी खरमरीत टीका अण्णांनी केली आहे.

Maharashtra Times 26 Apr 2017, 5:15 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mcd results aap leaders lacking in action says anna hazare
केजरीवाल फक्त बोलतात: अण्णा


दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं आहे. 'केजरीवाल फक्त बोलतात, त्यांची कृती शून्य आहे,' अशी खरमरीत टीका अण्णांनी केली आहे.

ते अहमदनगरमध्ये बोलत होते. 'दिल्ली शहर एक मॉडेल म्हणून विकसित केल्यानंतर अन्य ठिकाणी लक्ष घालावं, असा सल्ला मी केजरीवालांना दिला होता. मात्र, त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यांनी ते केलं असतं तर ही वेळ आली नसती. सत्तेची नशा मिळवण्यासाठीच ते लोकांना ‘अण्णा माझे गुरू आहेत,’ असं सांगत होतं हे आता माझ्या लक्षात आलंय. त्याच्यापासून दूर झालो ते एका परीनं बरंच झालं,' असा टोलाही अण्णांनी हाणला.
Kathni aur karni mein antar pad gaya hai: Anna Hazare on AAP #MCDelectionresults2017 pic.twitter.com/7B10nvjoeE — ANI (@ANI_news) April 26, 2017 'शुंगलू समितीनं त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. समितीच्या आरोपानंतर मला अत्यंत वेदना झाल्या. केजरीवालांचं शुद्ध आचार, विचार संपून त्यांचं जीवन डागाळलं आहे, असाच याचा अर्थ होतो. त्यांच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये फरक असल्याचा आरोप अण्णांनी केला. 'केजरीवालांकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या. त्यांनी माझ्या सर्व अपेक्षा धुळीस मिळविल्या आहेत. त्यांचे नेतेही कायदे पायदळी तुडवत आहेत. 'आप'चा पाठोपाठ होणारा पराभव हे लोकांनी त्यांना नाकारल्याचं लक्षण आहे. आता तरी त्यांनी बोध घ्यावा,' अशी अपेक्षाही अण्णांनी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज