अ‍ॅपशहर

रामदास कदमांची अद्याप तक्रार नाही

‘कोकणातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे सांगणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अजूनही अधिकृतपणे शासनाकडे तक्रार केलेली नाही’, असे जलसंधारण मंत्री व नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केले.

Maharashtra Times 20 May 2017, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम minister on jalyukta shivar
रामदास कदमांची अद्याप तक्रार नाही


‘कोकणातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे सांगणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अजूनही अधिकृतपणे शासनाकडे तक्रार केलेली नाही’, असे जलसंधारण मंत्री व नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केले. ‘तरीही प्रसिद्धी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार त्या प्रकाराची चौकशी शासनाने सुरू केली आहे’, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोकणातील कामात गैरव्यवहार झाल्याचा दावा पर्यावरण मंत्री कदम व त्यांच्या मुलाने केला होता. त्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांतून वृत्त आले होते. आपल्यापर्यंत तक्रार आली नसल्याचे त्याचवेळी जलसंधारण मंत्री प्रा. शिंदेंनी स्पष्ट केले होते. त्यावर, प्रा. शिंदेवर बालिशपणाचा आरोप करताना स्वतःच्या खात्यात चौकशी करण्याचा सल्ला कदमांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आज नगरमध्ये आयोजित भाजपच्या कार्यविस्तारक प्रशिक्षण मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रा. शिंदे यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली.

‘कोकणातील जलयुक्त शिवार कामांबाबत कदम यांनी आजतागायत कोणतीही अधिकृत तक्रार केलेली नाही. तरीही प्रसिद्धी माध्यमांतील वृत्तानुसार त्या कामांची चौकशी सुरू केली आहे. अधिकृत तक्रार नसल्याने कोण बालिश हे स्पष्ट होते’, असे सांगून प्रा. शिंदे म्हणाले, ‘जलयुक्त शिवारात कोठेही सरकारी अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कामे केली असतील व त्याच्या तक्रारी कोणी केल्या तर त्याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. शिवाय शासन यंत्रणेद्वारेही सर्व कामांच्या प्रगती आढाव्यात आढळलेल्या त्रुटींबद्दल दोषींवर कारवाई होणार आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाथर्डी तुरीची चौकशी

पाथर्डी बाजार समितीची दोन ट्रक तूर पोलिसांनी पकडल्याच्या प्रकाराबाबत सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांना सविस्तर माहिती दिली असून, त्यांच्याकडून या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे सांगून प्रा. शिंदे म्हणाले, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर दिली असेल तर त्याही प्रकारांची चौकशी यात होऊन दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज