नगर : 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १२ वर्षे झाली आहेत. पक्ष स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला राजकीय यशाचा 'ग्राफ' वाढल्याने आमच्या व कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं आणि लोकांच्या विश्वासाला पात्र न ठरल्यानेच आमचा आलेख ढासळला', अशी स्पष्ट कबुली मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज येथे दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचंही त्यांनी मान्य केले.
मनसेने सुरू केलेल्या विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीसाठी बाळा नांदगावकर नगरला आले होते. 'आमचा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित असून राज्याबाहेर जाणार नाही. आमची परप्रांतियांविरुद्धची भूमिका कायम असून महाराष्ट्रात मराठी मुलांनाच नोकरी मिळाली पाहिजे, हीच आमची मागणी असणार आहे', असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
'उद्योगपती रतन टाटा यांनी सांगितले म्हणून राज ठाकरे गुजरातला गेले होते व तेथील उत्तम कामाबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. पण पंतप्रधान होताना मोदींनी खोटे चित्र उभे केले, 'मेक इन इंडिया' व अन्य घोषणांतून भ्रमनिरास झाला. त्यामुळे जनतेची फसवणूक होत असल्याचे पाहून राज यांनी 'मोदीमुक्त भारत'ची घोषणा केल्याचा दावा करतानाच देशभरातील विरोधी पक्षांनी राज यांच्या या घोषणेला साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले. 'राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेण्यासाठी संयोजकांनीच राज यांना विनंती केली होती', असेही त्यांनी सांगितले.
'राज्यात शिवसेना व भाजप हे एकमेकांचे मित्र की शत्रू हेच कळत नाही', असा टोलाही त्यांनी लगावला. 'नाशिक शहरात मनसेनेच विकास कामे केली आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी येथील गाव दत्तक घेऊनही या गावात नवीन काहीच केलेले नाही. मनसेने मांडलेल्या राज्य विकासाच्या 'ब्ल्यु प्रिंट'मधीलच अनेक मुद्दे नावे बदलून भाजपने राबवल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, २० एप्रिलपासून राज ठाकरे राज्यात दौरा काढणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं.
मनसेने सुरू केलेल्या विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीसाठी बाळा नांदगावकर नगरला आले होते. 'आमचा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित असून राज्याबाहेर जाणार नाही. आमची परप्रांतियांविरुद्धची भूमिका कायम असून महाराष्ट्रात मराठी मुलांनाच नोकरी मिळाली पाहिजे, हीच आमची मागणी असणार आहे', असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
'उद्योगपती रतन टाटा यांनी सांगितले म्हणून राज ठाकरे गुजरातला गेले होते व तेथील उत्तम कामाबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. पण पंतप्रधान होताना मोदींनी खोटे चित्र उभे केले, 'मेक इन इंडिया' व अन्य घोषणांतून भ्रमनिरास झाला. त्यामुळे जनतेची फसवणूक होत असल्याचे पाहून राज यांनी 'मोदीमुक्त भारत'ची घोषणा केल्याचा दावा करतानाच देशभरातील विरोधी पक्षांनी राज यांच्या या घोषणेला साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले. 'राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेण्यासाठी संयोजकांनीच राज यांना विनंती केली होती', असेही त्यांनी सांगितले.
'राज्यात शिवसेना व भाजप हे एकमेकांचे मित्र की शत्रू हेच कळत नाही', असा टोलाही त्यांनी लगावला. 'नाशिक शहरात मनसेनेच विकास कामे केली आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी येथील गाव दत्तक घेऊनही या गावात नवीन काहीच केलेले नाही. मनसेने मांडलेल्या राज्य विकासाच्या 'ब्ल्यु प्रिंट'मधीलच अनेक मुद्दे नावे बदलून भाजपने राबवल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, २० एप्रिलपासून राज ठाकरे राज्यात दौरा काढणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं.