अ‍ॅपशहर

‘दुष्काळग्रस्तांनाही मोदींनी भेटून जावे’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ‘स्मार्ट सिटी’च्या उद्घाटनाला आलेच आहेत तर त्यांनी दुष्काळ सहन केलेल्या भागातील शेतकऱ्यांनाही भेटून जावे,’ असे आवाहन विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.

Maharashtra Times 26 Jun 2016, 1:08 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi should go to meet people in drought
‘दुष्काळग्रस्तांनाही मोदींनी भेटून जावे’


'व्यापारीधार्जिण्या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नाहीत. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या वेळी सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ‘स्मार्ट सिटी’च्या उद्घाटनाला आलेच आहेत तर त्यांनी दुष्काळ सहन केलेल्या भागातील शेतकऱ्यांनाही भेटून जावे,’ असे आवाहन विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी व प्रतापपूर गावात ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या छोट्या कार्यक्रमात बोलताना विखे यांनी हे आवाहन केले. सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘राज्यातील जनता दुष्काळाने होरपळली असताना सरकारने पुरेसे उपाय केले नाहीत. उलट चुकीची परिपत्रक काढून शेतकऱ्यांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवण्याचे काम यंत्रणा जाणीवपूर्वक करीत आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याचा चुकीचा अर्थ काढून भंडारदरा, निळवंडे धरणांसह गोदावरी खोऱ्यातील धरणांतून पाणी सोडण्यात आले. याचा मोठा परिणाम दोन्हीही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना भोगावा लागला आहे.

राज्यात पावसाअभावी मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, घाट माथ्यावरील पावसास अध्याप प्रारंभ नाही. शेतकऱ्यांकडील उत्पन्नाची सर्व साधने संपली आहेत. मागील सरकारने शेतकऱ्यांना पॉलिहाऊस, शेडनेटसाठी अनुदान दिले होते. मात्र या सरकारने हे अनुदान विनाकारण रखडविले आहे. शेतकऱ्यांनी नियमाने आणि पूर्वसंमती घेवून प्रस्ताव सादर केले होते. शेतकऱ्यांवरील संकटाचा विचार करुन हे अनुदान तातडीने शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावे,' अशी मागणीही त्यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज