म. टा. प्रतिनिधी, नगर
राज्यातील पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवृत्त पौलिस कल्याण संस्था व पोलिस बॉइज असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात पोलिसांचे कुटुंबातील सदस्य काळ्या फिती, निषेध घोषणांचे फलक घेऊन सहभागी झाले होते.
राज्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ले वाढले आहेत. त्या निषेधार्थ सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांवरील हल्लेखोरांचा धिक्कार असो, गुंडांचा राजकीय आश्रय थांबलाच पाहिजे, असा निषेधाचे फलक घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनला देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी हल्ला केल्यास गुन्ह्यात जामीन मिळू नये, अशी तरतूद करण्यात यावी, हल्ला करणाऱ्या जनतेतून निवडून आला असेल तर भविष्य काळात कमीत कमी दहा वर्षे निवडणूक लढविण्यासाठी त्याला अपात्र ठरावे, हल्ला करणाऱ्यांचे लोकप्रतिनिधीत्व रद्द करण्यात यावेत, कोर्टात चालणाऱ्या केसेस शाससनातर्फे काढून घेतल्या जाऊ नयेत, पोलिसांचे नाव वापरून स्वयंप्रसिद्धी करून घेणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देऊ नये, गेल्या दहा वर्षांत झालेल्या सर्व पोलिसांवरील हल्ल्यांची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नेमण्यात यावा, पोलिसांवरील हल्ल्यांच्या केसेस चालविण्यासाठी स्वतंत्र सत्र न्यायालयाची स्थापना करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहे.
निवृत्त पोलिस कल्याण संस्थेचे अध्यक्ष निसार अहमद शेख, भाऊ बारवकर, अशोक खैरे, अरुण शिंदे, सुधाकर सप्रे, नामदेव शेजल, नितीन खंडागळे, मंदार लष्कर, सिधांत ससाणे, संकेत पवार, नवशाद शेख, ऋषीकेश दरंदले, महेश ससे, सागर अनारसे, अमोल खाडे, प्रशांत रोकडे मोर्चात सहभागी होते.
राज्यातील पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवृत्त पौलिस कल्याण संस्था व पोलिस बॉइज असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात पोलिसांचे कुटुंबातील सदस्य काळ्या फिती, निषेध घोषणांचे फलक घेऊन सहभागी झाले होते.
राज्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ले वाढले आहेत. त्या निषेधार्थ सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांवरील हल्लेखोरांचा धिक्कार असो, गुंडांचा राजकीय आश्रय थांबलाच पाहिजे, असा निषेधाचे फलक घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनला देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी हल्ला केल्यास गुन्ह्यात जामीन मिळू नये, अशी तरतूद करण्यात यावी, हल्ला करणाऱ्या जनतेतून निवडून आला असेल तर भविष्य काळात कमीत कमी दहा वर्षे निवडणूक लढविण्यासाठी त्याला अपात्र ठरावे, हल्ला करणाऱ्यांचे लोकप्रतिनिधीत्व रद्द करण्यात यावेत, कोर्टात चालणाऱ्या केसेस शाससनातर्फे काढून घेतल्या जाऊ नयेत, पोलिसांचे नाव वापरून स्वयंप्रसिद्धी करून घेणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देऊ नये, गेल्या दहा वर्षांत झालेल्या सर्व पोलिसांवरील हल्ल्यांची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नेमण्यात यावा, पोलिसांवरील हल्ल्यांच्या केसेस चालविण्यासाठी स्वतंत्र सत्र न्यायालयाची स्थापना करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहे.
निवृत्त पोलिस कल्याण संस्थेचे अध्यक्ष निसार अहमद शेख, भाऊ बारवकर, अशोक खैरे, अरुण शिंदे, सुधाकर सप्रे, नामदेव शेजल, नितीन खंडागळे, मंदार लष्कर, सिधांत ससाणे, संकेत पवार, नवशाद शेख, ऋषीकेश दरंदले, महेश ससे, सागर अनारसे, अमोल खाडे, प्रशांत रोकडे मोर्चात सहभागी होते.