नगर : मुळानगर पंपिंग स्टेशन परिसरात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वीज वितरण कंपनीच्या नांदगाव शिवारात जाणाऱ्या मुख्य उच्च दाब वीज वाहिनीवरून शहर पाणीपुरवठा योजनेला विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. या मुख्य उच्च दाब वीज वाहिनीवरूनच वादळी वाऱ्यामुळे झाड पडून विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे पाणी उपसा बंद झाला असून, शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनी व मनपाच्या विळद येथील कर्मचाऱ्यांमार्फत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर मुळानगर व विळद पंपिंग स्टेशन येथून टप्प्याटप्प्प्याने पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. पाणी उपसा सुरू झाल्यानंतर वसंत टेकडी येथे पूर्ण दाबाने पाणी येण्यास सुमारे चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यास मंगळवारी (१९ जून) शहराच्या मध्यवर्ती भागास उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
दरम्यान, वादळी वारा व पावसामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नियमित पाणी होण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.
वीज वितरण कंपनीच्या नांदगाव शिवारात जाणाऱ्या मुख्य उच्च दाब वीज वाहिनीवरून शहर पाणीपुरवठा योजनेला विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. या मुख्य उच्च दाब वीज वाहिनीवरूनच वादळी वाऱ्यामुळे झाड पडून विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे पाणी उपसा बंद झाला असून, शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनी व मनपाच्या विळद येथील कर्मचाऱ्यांमार्फत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर मुळानगर व विळद पंपिंग स्टेशन येथून टप्प्याटप्प्प्याने पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. पाणी उपसा सुरू झाल्यानंतर वसंत टेकडी येथे पूर्ण दाबाने पाणी येण्यास सुमारे चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यास मंगळवारी (१९ जून) शहराच्या मध्यवर्ती भागास उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
दरम्यान, वादळी वारा व पावसामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नियमित पाणी होण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.