अ‍ॅपशहर

हत्याकांडांचा तपास लागेना

गेल्या महिन्याभरापासून एकापाठोपाठ होत असलेल्या हत्याकांडामुळे नगर जिल्हा हादरून गेला आहे. कर्जत, नगर, शेवगाव या तालुक्यात मिळून चार हत्याकांड घडले आहेत.

Maharashtra Times 18 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम murder case investigation delay
हत्याकांडांचा तपास लागेना

गेल्या महिन्याभरापासून एकापाठोपाठ होत असलेल्या हत्याकांडामुळे नगर जिल्हा हादरून गेला आहे. कर्जत, नगर, शेवगाव या तालुक्यात मिळून चार हत्याकांड घडले आहेत. नगर व कर्जत येथील हत्याकांडात मृतदेह जाळून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे मृतांची ओळख पटविण्यापासून आरोपीला अटक करण्यापर्यंत पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. सातत्याने होत असलेल्या हत्याकांडामुळे पोलिसांची मात्र झोप उडाली आहे.
शेवगाव येथील हरवणे कुटुंबातील चौघांची हत्या झाली. या हत्याकांडात सुरुवातीला पोलिसांना कुठलीच माहिती मिळत नसल्याने पोलिस चक्रावून गेले होते. काही दिवसांच्या तपासानंतर चोरीच्या उद्देशाने हत्याकांड झाले असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणून मुख्य आरोपींसह तीन आरोपींना जेरबंद केले आहे. यातील मुख्य आरोपी रमेश भोसले याने जळगाव जिल्ह्यात अशाच पद्धतीने खून केले आहेत. हरवणे हत्याकांडातील एक आरोपी अल्पवयीन निघाला. तर एकाने अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयात केला होता. त्यामुळे तपासात पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पाठोपाठ कर्जत तालुक्यातील दूरगाव येथील जंगलामध्ये एक महिला व दोन मुले असे तीन मृतदेह आढळून आले. हे तिन्ही मृतदेह जाळण्यात आल्याने त्यांची ओळखही पटू शकलेली नाही. मृतांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तर चार दिवसांपासून नगर शहराजवळील केकताईच्या डोंगरात एक साधू व एका शिष्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. केकताई डोंगरात असलेल्या मठातील एकाने हे हत्याकांड केल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु या व्यक्तीबाबत पोलिसांना काहीच माहिती मिळालेली नाही. आरोपीचा फोटो ही पोलिसांना उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यापाठोपाठ सोमवारी पुन्हा शेवगाव येथे एका महिलेची व पुरुषाची हत्या करण्यात आली असून, यातील आरोपीने पुरावा मागे ठेवला नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
क्रूर पद्धतीने हत्या करून डोंगरात, निर्मणुष्य ठिकाणी मृतदेह टाकून दिले जातात. तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकले जातात. वैयक्तीक कारणातून हत्या करून हे मृतदेह जाळण्यात येत असल्याने मृतांची ओळख पटत नाही. तसेच खूनासाठी वापरण्यात आलेले हत्यारेही सापडत नाहीत, अशी स्थिती आहे. या सर्व प्रकारामुळे पोलिसांसाठी या प्रकरणांचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज