अ‍ॅपशहर

नगरमधील वृद्ध दाम्पत्याच्या खुनाचे गूढ उकलण्यात यश; पोलिसांनी ३ आरोपींना केली अटक

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने या हत्या प्रकरणाची उकल केली. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Authored byविजयसिंह होलम | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2022, 11:27 am
अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील आपेगाव शिवारातील भुजाडे वस्तीवरील वृद्ध दाम्पत्याच्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. चोरीच्या उद्देशानेच दोघांचा खून केल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी तिघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagar murder police
नगरमध्ये हत्याकांडाचा उलगडा


आपेगाव शिवारात घराच्या छतावर दत्तात्रय गंगाधर भुजाडे (अंदाजे वय ७५) व पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय ६५) यांचे मृतदेह आढळून आले होते. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. त्यांचा खून कशासाठी करण्यात आला, याचा तपास सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने याची उकल केली. या प्रकरणी अजय छंदू काळे (वय १९), अमित कागद चव्हाण(वय २०) व जंतेश छंदू काळे(वय २२) या तिघांना अटक केली आहे. चोरीसाठी त्यांना खून केल्याचे आढळून आले.

नेमकं काय घडलं होतं?

कोपरगाव तालुक्यातील आपेगावगावजळ भुजाडे कुटुंब शेतात राहते. त्यांची दोन मुले उच्च शिक्षित असून पुण्यात नोकरीनिमित्त राहतात. ते आपल्या आई आणि वडिलांना सोमवारी (३० मे) पासून फोन करत होते. मात्र त्यांचा फोन उचलला जात नव्हता. त्यामुळे आई-वडील शेताच्या कामात असतील असे मुलांना वाटले. मात्र दोन दिवस होऊनही ते आपला फोन उचलत नाहीत, म्हणून शंका आली. त्यामुळे त्यांनी बुधवारी आपला चुलत भाऊ पोपट भुजाडे यांना फोन करून घरी जाऊन पाहण्यास सांगितले.

भरधाव कारची ट्रॅक्टरला धडक: एअर बॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली

चुलत भाऊ पोपट भुजाडे यांच्या घरी गेला. तेथे त्यांच्या घराला कुलूप होते. त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले, मात्र आत काहीही दिसले नाही. त्यानंतर पोपट भुजाडे यांनी छतावर जाऊन पाहिले असता तेथे दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलीस पाटील सुदाम शिंदे यांच्यामार्फत ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. स्थानिक पोलीस, नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आणि त्यानंतर या घटनेचा तपास सुरू करण्यात आला होता.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख