अ‍ॅपशहर

नगर: सलग सुट्ट्यांचा फटका, पुणे-नाशिक महामार्गावर कोंडी

सलग आलेल्या सुट्ट्या संपवून चाकरमानी घराकडे परतू लागल्याने आज दुपारनंतर पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव टोलनाक्‍यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. टोलनाक्‍याबरोबरच महामार्गावर ठिकठिकाणी प्रवाशांची गर्दी दिसून आली. टोल वसुलीवर ताण पडला होता. पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तोबा गर्दी होती. त्यामुळे वाहनांमध्येच बराच वेळ बसून रहावे लागल्याने चाकरमान्यांचा संतापाचा पारा चढला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2019, 7:58 pm
नगर: सलग आलेल्या सुट्ट्या संपवून चाकरमानी घराकडे परतू लागल्याने आज दुपारनंतर पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव टोलनाक्‍यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. टोलनाक्‍याबरोबरच महामार्गावर ठिकठिकाणी प्रवाशांची गर्दी दिसून आली. टोल वसुलीवर ताण पडला होता. पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तोबा गर्दी होती. त्यामुळे वाहनांमध्येच बराच वेळ बसून रहावे लागल्याने चाकरमान्यांचा संतापाचा पारा चढला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic


सलग सुट्ट्या आल्याने रक्षाबंधनासाठी अनेक चाकरमानी कुटुंबीयांसह गावाकडे आले होते. सुट्ट्या संपल्याने उद्यापासून पुन्हा कामावर हजर होण्यासाठी चाकरमान्यांनी मुंबई-पुण्याचा रस्ता धरला. त्यामुळे दुपारपासूनच महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे महामार्ग 'हाऊसफुल्ल' झाला होता. विशेषत: नाशिककडे जाणाऱ्या वाहनांची संख्या तुरळक होती. नाशिक, संगमनेरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या चारही मार्गावर वाहनांच्या रांगा दिसत होत्या. त्यामुळे महामार्ग वाहनांनी फुलून गेला होता. सुमारे दोन ते तीन किलोमीटर रांगा लागल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चालक मिळेल. त्या जागेतून वाहने पुढे नेत असल्याने ही कोंडी अधिकच गुंतागुंतीची होत होती. त्यामुळे टोलनाका पास करण्यासाठी किमान अर्ध्या तासाचा कालावधी लागत होता. दुचाकीस्वारांसाठी जागाच नसल्याने मिळेल, त्या जागेतून दुचाकीस्वार पुढे जात होते. त्यातूनही कोंडीत भर पडत होती.

दरम्यान, चंदनापुरीघाटात मागील महिन्यात १२ जुलै रोजी रात्री संरक्षक जाळ्यासह दरडीचा मोठा भाग नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन पडला होता. तेव्हापासून घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. रविवारी दुपारनंतर घाटात वाहतूक मंदावली होती. घाटात महिन्यांपेक्षा अधिककाळ एकेरी वाहतूक सुरू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून घाट परिसरातून प्रवास करताना चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज