अ‍ॅपशहर

Rohit Pawar: ...तर आम्ही शांत बसणार नाही; रोहित पवारांचा दानवेंना कडक इशारा

Farmers Protest: कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संबंध चीन व पाकिस्तानशी जोडणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खणखणीत इशारा दिला आहे. (Rohit Pawar warns Raosaheb Danve)

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Dec 2020, 4:26 pm
अहमदनगर: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासारख्या विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या वक्तव्यांची हल्ली कोणी फारशी दखल घेत नाही. मात्र, दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा असे वक्तव्य केले तर मात्र आम्ही विरोधक म्हणून नाही तर राजकारणाबाहेर जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून योग्य ते उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. (Rohit Pawar warns Raosaheb Danve)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Pawar-Raosaheb Danve


वाचा: 'शक्ती' कायद्यावरून नीतेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना मंत्री दानवे यांनी या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे वक्तव्य केले आहे. याबद्दल कर्जतमध्ये बोलताना पवार यांनी त्यांचा चांगलचा समाचार घेतला आहे. पवार म्हणाले, ‘भाजपमध्ये अनेक लोक असे आहेत की ते अशी निराधार वक्तव्य करीत असतात. शेतकरी स्वत:च्या हितासाठी लढत असताना त्यांना शत्रू राष्ट्रांकडून मदत मिळत असल्याचे म्हणणे म्हणजे आपल्या घाणेरड्या विचारसरणीचे प्रदर्शन आहे. दानवे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांबद्दल निंदनीय वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांचे शेतकऱ्यांबद्दल असलेले विचार लोकांना कळून चुकले होते. दानवे यांचे ते वक्तव्य शेतकरी अद्याप विसरलेले नाहीत. हेच दानवे जेव्हा आता पुन्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी वक्तव्य करतात तेव्हा पुन्हा एकदा त्यांची तीच विचारसरणी पुढे येत आहे. यापुढे दानवे यांना आम्ही राजकीय विरोधक म्हणून काही उत्तर देण्यापेक्षा सर्वसामान्य लोकच त्यांना योग्य ते उत्तर देतील. अशा लोकांचे वक्तव्य जास्त कोणीही फारसे मनाला लावून घेऊ नये, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. मात्र ते असेच पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर आम्ही सुद्धा शांत राहणार नाही.’

वाचा: 'तसं असेल तर मोदी सरकारनं चीनवर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे'
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज