म. टा. प्रतिनिधी, नगर
गणरायाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांना विविध सामाजिक संस्थांनी पाणी व महाप्रसादाचे वाटप केले. घरगुती गणेशाचे विसर्जन व्यवस्थित करता यावे, यासाठी अनेक संस्थांनी कृत्रिम हौद उभारत व्यवस्था केली होती. यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी घेतलेला हा सहभाग गणेशभक्तांसाठी आधार देणारा ठरला. यानिमित्ताने विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य आदी विषयांवर जनजागृतीही केली.
गणरायाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला रामचंद्र खुंट येथून सुरुवात झाली. मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे यांनी महाप्रसादाचे व्यवस्था केली होती. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पथकातील सदस्य, मिरवणूक पाहण्यासाठी आलेले गणेशभक्त यांना पोहे, पुरी-भाजी, भात असे पदार्थ वाटण्यात येत होते. भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही महाप्रसाद वाटपाच्या स्टॉलला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
स्थायी समितीचे माजी सभापती गणेश भोसले यांनी साईनगर परिसरात दोन फुट उंचीच्या छोट्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौद उभारला होता. तर, माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीने यशोदानगर येथे अशी सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. लार्सन अँड टुब्रो कंपनीने सावेडीच्या गंगा उद्यानात असा हौद केला होता.
सामाजिक संदेश देत गणरायाला निरोप
सावेडीत माहेश्वरी समाजाच्या वतीने सामुदायिक गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
आम्रपाली गार्डन येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीमध्ये मुलींचे लेझीम पथक सहभागी झाले होते. तसेच लहान मुलांनी 'बेटी बचाव', 'स्वच्छता अभियान', 'वृक्ष वाचवा-वृक्ष लावा', 'जो सुरक्षा से दोस्ती तोडेगा, वह एक दिन दुनिया छोडेगा', 'दिया रक्त ना व्यर्थ जाएगा, एक दिन वापस आएगा', 'बेटी हे तो कल है' असे विविध सामाजिक संदेश असणारे फलक हातामध्ये घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
चौकट ः
शांतता समितीने स्थान बदलले
गणपती विसर्जनाच्या दिवशी दरवर्षी नवी पेठेतील घासगल्ली चौकात शांतता समितीच्या सदस्यांसाठी पोलिसांकडून व्यवस्था करण्यात येते. या ठिकाणी हे सदस्य थांबून मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करीत असतात. यंदा मात्र नवी पेठ येथे मंडपाव्यतिरिक्त प्रशासनातर्फे माईक, खुर्च्या व अन्य व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे समितीचे सदस्य येथे थांबलेच नाहीत. अखेर या चौकातील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील मंडपात थांबून मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून परंपरा जपली. दरम्यान, पोलिसांनी यंदा शांतता समितीच्या सदस्यांची व्यवस्था नवी पेठऐवजी चितळे रोड पोलिस चौकी येथे केली असल्याने समितीचे सदस्य तेथे थांबले, असे अॅड. शिवाजी कराळे यांनी सांगितले.
चौकट ः
राठोड यांची टीका
नगरचे विसर्जन ठिकाण बदलत असून, राजकारणातून सगळ्यांनाच नेता सुभाष चौकातच थांबायचे असल्याने पुढच्या वेळी या चौकातच या मंडळांसाठी विसर्जन व्यवस्था करणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केली. शिवसेनेचा गणपती नेता सुभाष चौकात आल्यानंतर पुढे विसर्जनासाठी जातो. पण या वेळी काही मंडळांनी मुद्दामहून संथपणा दाखवला. हे मर्दपणाचे लक्षण नाही, असे सांगून, पोलिसांनीही वेळेचे नियोजन केले नाही, प्रत्येक मंडळाला वेळ ठरवून द्यायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
गणरायाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांना विविध सामाजिक संस्थांनी पाणी व महाप्रसादाचे वाटप केले. घरगुती गणेशाचे विसर्जन व्यवस्थित करता यावे, यासाठी अनेक संस्थांनी कृत्रिम हौद उभारत व्यवस्था केली होती. यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी घेतलेला हा सहभाग गणेशभक्तांसाठी आधार देणारा ठरला. यानिमित्ताने विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य आदी विषयांवर जनजागृतीही केली.
गणरायाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला रामचंद्र खुंट येथून सुरुवात झाली. मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे यांनी महाप्रसादाचे व्यवस्था केली होती. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पथकातील सदस्य, मिरवणूक पाहण्यासाठी आलेले गणेशभक्त यांना पोहे, पुरी-भाजी, भात असे पदार्थ वाटण्यात येत होते. भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही महाप्रसाद वाटपाच्या स्टॉलला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
स्थायी समितीचे माजी सभापती गणेश भोसले यांनी साईनगर परिसरात दोन फुट उंचीच्या छोट्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौद उभारला होता. तर, माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीने यशोदानगर येथे अशी सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. लार्सन अँड टुब्रो कंपनीने सावेडीच्या गंगा उद्यानात असा हौद केला होता.
सामाजिक संदेश देत गणरायाला निरोप
सावेडीत माहेश्वरी समाजाच्या वतीने सामुदायिक गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
आम्रपाली गार्डन येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीमध्ये मुलींचे लेझीम पथक सहभागी झाले होते. तसेच लहान मुलांनी 'बेटी बचाव', 'स्वच्छता अभियान', 'वृक्ष वाचवा-वृक्ष लावा', 'जो सुरक्षा से दोस्ती तोडेगा, वह एक दिन दुनिया छोडेगा', 'दिया रक्त ना व्यर्थ जाएगा, एक दिन वापस आएगा', 'बेटी हे तो कल है' असे विविध सामाजिक संदेश असणारे फलक हातामध्ये घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
चौकट ः
शांतता समितीने स्थान बदलले
गणपती विसर्जनाच्या दिवशी दरवर्षी नवी पेठेतील घासगल्ली चौकात शांतता समितीच्या सदस्यांसाठी पोलिसांकडून व्यवस्था करण्यात येते. या ठिकाणी हे सदस्य थांबून मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करीत असतात. यंदा मात्र नवी पेठ येथे मंडपाव्यतिरिक्त प्रशासनातर्फे माईक, खुर्च्या व अन्य व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे समितीचे सदस्य येथे थांबलेच नाहीत. अखेर या चौकातील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील मंडपात थांबून मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून परंपरा जपली. दरम्यान, पोलिसांनी यंदा शांतता समितीच्या सदस्यांची व्यवस्था नवी पेठऐवजी चितळे रोड पोलिस चौकी येथे केली असल्याने समितीचे सदस्य तेथे थांबले, असे अॅड. शिवाजी कराळे यांनी सांगितले.
चौकट ः
राठोड यांची टीका
नगरचे विसर्जन ठिकाण बदलत असून, राजकारणातून सगळ्यांनाच नेता सुभाष चौकातच थांबायचे असल्याने पुढच्या वेळी या चौकातच या मंडळांसाठी विसर्जन व्यवस्था करणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केली. शिवसेनेचा गणपती नेता सुभाष चौकात आल्यानंतर पुढे विसर्जनासाठी जातो. पण या वेळी काही मंडळांनी मुद्दामहून संथपणा दाखवला. हे मर्दपणाचे लक्षण नाही, असे सांगून, पोलिसांनीही वेळेचे नियोजन केले नाही, प्रत्येक मंडळाला वेळ ठरवून द्यायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.