अ‍ॅपशहर

बेदखल तक्रारींची दखल

पोलिस अधीक्षक कार्यालयात सायबर पोलिस स्टेशन सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून आलेल्या सायबर गुन्हा संदर्भातील तक्रारींची दखल घेण्यात घेण्यात आली असून, शंभरहून अधिक तक्रार अर्जांवर कार्यवाही करण्यात येत आहे.

Maharashtra Times 28 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम niglected complaints will overlooked
बेदखल तक्रारींची दखल


पोलिस अधीक्षक कार्यालयात सायबर पोलिस स्टेशन सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून आलेल्या सायबर गुन्हा संदर्भातील तक्रारींची दखल घेण्यात घेण्यात आली असून, शंभरहून अधिक तक्रार अर्जांवर कार्यवाही करण्यात येत आहे. बनावट फेसबूक अकाउंट उघडून बदनामी करणे, फोनवरून एटीएम कार्डचा पीन क्रमांक घेऊन फसवणूक झालेल्या या तक्रारी आहेत.

सायबर गुन्ह्याचे प्रकार वाढत असला तरी या गुन्ह्यांची दखल घेऊन पोलिस विभागाकडून तपास केला जात नाही. अनेकदा पोलिस स्टेशनला या प्रकारचे गुन्ह्याच दाखल करून घेतले जात नाहीत. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सायबर सेल सुरू करण्यात आला होता. परंतु, वर्षभरात जिल्ह्यात बाराच सायबर गुन्हे दाखल झाल्याची आकडेवारी असून, ते गुन्हे तपासावरच आहेत. तर शंभरहून अधिक तक्रारी सायबर सेलकडे आल्या होत्या. परंतु, या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नव्हती. त्यात निम्म्या तक्रारी या फोन करून बँक अकाउंटची माहिती घेऊन खात्यातून पैसे काढण्याच्या आहेत. तर इतर तक्रारी या बनावट फेसबूक अकाउंट उघडून बदनामी केल्याच्या आहेत. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सायबर सेल ऐवजी सायबर पोलिस स्टेशन निर्माण केले असून, पोलिस निरीक्षक सुनील पवार यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनी या तक्रारींची दखल घेऊन निपटारा सुरू केला आहे. तथ्य असलेल्या तक्रारींचा तपासही करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज