म. टा. प्रतिनिधी, नगर
पंजाब नॅशनल बँक कर्ज गैरव्यवहारात अडकलेल्या उद्योगपती नीरव मोदीची खंडाळा (ता. कर्जत) येथील जमीन शेतकऱ्यांना परत मिळावी, यासाठी येथील पीपल्स हेल्पलाइनच्या पुढाकाराने येत्या शनिवारी (१७ मार्च) आंदोलन करण्यात येणार आहे. खंडाळा येथे नीरव मोदीच्या जमिनीवर नांगर फिरवून मूळ शेतकऱ्यांना तिचा ताबा देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनाला 'काळी आई मुक्ती संग्राम' असे नाव देण्यात आले आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर 'ईडी'ने (सक्तवसुली संचालनालय) ठिकठिकाणी छापे टाकून नीरव मोदीची मालमत्ता जप्त केली आहे. छाप्यांत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे पुढील शोध घेतला जात आहे. एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यात कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात सौरऊर्जा प्रकल्पासाठी नीरव मोदीने खरेदी केलेल्या जमिनीची माहिती मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात 'ईडी'चे अधिकारी कर्जतला आले होते. त्यांनी कागदपत्रांची तपासणी करून महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित जमिनीची पाहणी केली व नीरव मोदीच्या नावे असलेली ही जमीन जप्त केली आहे. जवळपास १३५ एकर ही जमीन असल्याचे सांगितले जाते. ही जमीन मूळ शेतकऱ्यांना पुन्हा मिळण्यासाठी काही जण पुढे सरसावले आहेत.
कर्जत तालुक्यातील नीरव मोदीची ही जमीन मूळ शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी येथील पीपल्स हेल्पलाइन संघटनेने पुढाकार घेतला असून 'काळी आई मुक्ती संग्राम' आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या शनिवारी संघटनेचे कार्यकर्ते खंडाळा येथे जाणार असून मोदीच्या जमिनीवर मूळ शेतकरी नांगर फिरवून त्यावर आपला ताबा घोषित करणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. कर्जतचे माजी सभापती किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात अॅड. कैलास शेवाळे, मिलिंद बागल, भाऊसाहेब वाघमोडे, माजी सरपंच रघुनाथ खरात, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, हराबाई ग्यानप्पा, विठ्ठल सुरम यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पंजाब नॅशनल बँक कर्ज गैरव्यवहारात अडकलेल्या उद्योगपती नीरव मोदीची खंडाळा (ता. कर्जत) येथील जमीन शेतकऱ्यांना परत मिळावी, यासाठी येथील पीपल्स हेल्पलाइनच्या पुढाकाराने येत्या शनिवारी (१७ मार्च) आंदोलन करण्यात येणार आहे. खंडाळा येथे नीरव मोदीच्या जमिनीवर नांगर फिरवून मूळ शेतकऱ्यांना तिचा ताबा देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनाला 'काळी आई मुक्ती संग्राम' असे नाव देण्यात आले आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर 'ईडी'ने (सक्तवसुली संचालनालय) ठिकठिकाणी छापे टाकून नीरव मोदीची मालमत्ता जप्त केली आहे. छाप्यांत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे पुढील शोध घेतला जात आहे. एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यात कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात सौरऊर्जा प्रकल्पासाठी नीरव मोदीने खरेदी केलेल्या जमिनीची माहिती मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात 'ईडी'चे अधिकारी कर्जतला आले होते. त्यांनी कागदपत्रांची तपासणी करून महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित जमिनीची पाहणी केली व नीरव मोदीच्या नावे असलेली ही जमीन जप्त केली आहे. जवळपास १३५ एकर ही जमीन असल्याचे सांगितले जाते. ही जमीन मूळ शेतकऱ्यांना पुन्हा मिळण्यासाठी काही जण पुढे सरसावले आहेत.
कर्जत तालुक्यातील नीरव मोदीची ही जमीन मूळ शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी येथील पीपल्स हेल्पलाइन संघटनेने पुढाकार घेतला असून 'काळी आई मुक्ती संग्राम' आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या शनिवारी संघटनेचे कार्यकर्ते खंडाळा येथे जाणार असून मोदीच्या जमिनीवर मूळ शेतकरी नांगर फिरवून त्यावर आपला ताबा घोषित करणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. कर्जतचे माजी सभापती किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात अॅड. कैलास शेवाळे, मिलिंद बागल, भाऊसाहेब वाघमोडे, माजी सरपंच रघुनाथ खरात, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, हराबाई ग्यानप्पा, विठ्ठल सुरम यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.