म. टा. वृत्तसेवा, कर्जत
संभाजी ब्रिगेड सह विविध संघटनांनी निर्भयाच्या स्मारकास तीव्र विरोध केलेला असतानाही गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता त्या स्मारकावर निर्भयाचा पुतळा उभा करण्यात आला आहे. मात्र वातावरण पुन्हा तणाव निर्माण झाल्याने निर्भयाच्या नातेवाईकांनी तो पुतळा पांढऱ्या कापडाने झाकून टाकला आहे; मात्र, पुतळा उभा केल्याचे वृत्त समजातच संभाजी ब्रिगेडचे नगर जिल्ह्याचे प्रमुख राजेश परकाळे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, संघटनांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.
कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी निर्भयावर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेमुळे देश हादरून गेला होता. राज्यामध्ये लाखोंच्या उपस्थितीमध्ये शिस्तबद्ध मूक मोर्चे काढण्यात आले होते. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांना अटक करून नगर येथील न्यायालयात त्यांच्यावर खटला सुरू आहे. राज्याचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती केली आहे.
स्मारकाचा वाद
निर्भयाचे स्मारक बांधण्यासाठी राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी पुढाकार घेतला त्यानुसार त्यांनी स्मारकाचे बांधकाम पूर्ण करून गुरुवारी (१३ जुलै) त्याचा अनावरण कार्यक्रम ठेवला; मात्र, हे स्मारक आमचा अपमानाचे स्माकर आहे व स्मारक पराक्रमाचे असावे अपमानाचे नाही, असे म्हणत संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी त्यास तीव्र विरोध केला. गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने कर्जत येथे राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावरून पोलिसांनी राजेश परकाळे यांच्यासह ७ जणांना अटक केली. येथे वाद निर्माण झाल्याने भय्यूजी महाराज कोपर्डी येथे आले नाहीत, अशा अनेक घडमोडी गुरुवारी दिवसभर घडल्या.
गुरुवारी दिवसभर अनेक घडामोडी घडल्याच्या पार्श्वभूमीवर रात्री साडेअकराच्या सुमारास निर्भयाचा पुतळा त्या स्मारकाच्या ठिकाणी बसवण्यात आला. सकाळी सर्वत्र वाऱ्यासारखी ही बातमी पसरली. यांनतर सकाळी निर्भयाच्या नातेवाईकांनी हा पुतळा पांढऱ्या कापडाने झाकून ठेवला. हा पुतळा भय्यूजी माहराज यांचे शिष्य कृष्णा शेळके व पोलिस पाटील समीर जगताप (दोघेही रा. कर्जत) आणि दादा पाटील (बुलडाणा) यांनी बसवला आहे, असा
आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे.
या संदर्भात विचारणा केली असता मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, हे स्मारक नाही आमची मुलगी आहे. तिची आठवण म्हणून आम्ही समाधी बांधली आहे व त्याच्यावर आम्ही पुतळा बसवला आहे. यामध्ये कोणाचा काही संबंध नाही. भविष्यात आम्ही येथे आमच्या मुलीचे मंदिरही बांधणार आहोत. आम्हाला सर्वांनी खूप आधार दिला आहे. कोणाची भावना दुखवावी, असा आमचा हेतू नाही. कृपया कोणी गैरसमज करू नये, आज एक वर्ष झाले. आम्ही लेकराच्या आठवणीने जगत आहोत. आम्ही अन्न पाणी निट घेत नाही, ती आमच्या डोळ्यासमारे राहावी यासाठी ही समाधी आम्हीच बांधली आहे. विनाकारण कोणाचे नाव घेऊ नये व आपली एकजुट कायम ठेवावी. त्या नराधमांना फाशी व्हावी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावी, अशी आमची सर्व बांधवाना आणि भगिनींना विनंती आहे.
कोट ः
कोपर्डी येथे निर्भयाच्या समाधीवर तिच्या नातेवाईकांनी गुरुवारी रात्री पुतळा बसवला आहे; मात्र, तो त्यांनी झाकून ठेवला आहे. त्या समाधीस पोलिस संरक्षण दिले आहे; मात्र, त्या निर्भयाच्या कुटुंबीयांची भावना असल्याने त्याचा विचार सर्वांनी करावा व कोणी तणाव वाढेल असे कृत्य करू नये. कायदा हातामध्ये घेतल्यास कारवाई करू.
- सुर्दशन मुंडे, विभागीय पोलिस अधिकारी
कोपर्डी येथील समाधी की स्मारक याबद्दल सुरू असलेला वाद हे केवळ राजकारण आणि श्रेय घेण्याची धडपड आहे; मात्र, त्या निर्भयाचे कुटुंबांचा विचार काय आहे, याचा विचार कोणी करण्यास तयार नाही व भय्यूजी महाराज हे राष्ट्रसंत आहेत ते पण आपलेच आहेत. त्यांनी कोपर्डीच्या मुलींसाठी मोफत दोन गाड्या दिल्या आहेत व त्या वर्षभर सुरू आहेत. या शिवाय कोपर्डी गावासाठी त्यांनी विकासाचे मॉडेल तयार केले आहे. याचा विचार कोण करण्यास तयार नाही.
- दीपक शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, बहिरोबावाडी
संभाजी ब्रिगेड सह विविध संघटनांनी निर्भयाच्या स्मारकास तीव्र विरोध केलेला असतानाही गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता त्या स्मारकावर निर्भयाचा पुतळा उभा करण्यात आला आहे. मात्र वातावरण पुन्हा तणाव निर्माण झाल्याने निर्भयाच्या नातेवाईकांनी तो पुतळा पांढऱ्या कापडाने झाकून टाकला आहे; मात्र, पुतळा उभा केल्याचे वृत्त समजातच संभाजी ब्रिगेडचे नगर जिल्ह्याचे प्रमुख राजेश परकाळे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, संघटनांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.
कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी निर्भयावर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेमुळे देश हादरून गेला होता. राज्यामध्ये लाखोंच्या उपस्थितीमध्ये शिस्तबद्ध मूक मोर्चे काढण्यात आले होते. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांना अटक करून नगर येथील न्यायालयात त्यांच्यावर खटला सुरू आहे. राज्याचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती केली आहे.
स्मारकाचा वाद
निर्भयाचे स्मारक बांधण्यासाठी राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी पुढाकार घेतला त्यानुसार त्यांनी स्मारकाचे बांधकाम पूर्ण करून गुरुवारी (१३ जुलै) त्याचा अनावरण कार्यक्रम ठेवला; मात्र, हे स्मारक आमचा अपमानाचे स्माकर आहे व स्मारक पराक्रमाचे असावे अपमानाचे नाही, असे म्हणत संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी त्यास तीव्र विरोध केला. गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने कर्जत येथे राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावरून पोलिसांनी राजेश परकाळे यांच्यासह ७ जणांना अटक केली. येथे वाद निर्माण झाल्याने भय्यूजी महाराज कोपर्डी येथे आले नाहीत, अशा अनेक घडमोडी गुरुवारी दिवसभर घडल्या.
गुरुवारी दिवसभर अनेक घडामोडी घडल्याच्या पार्श्वभूमीवर रात्री साडेअकराच्या सुमारास निर्भयाचा पुतळा त्या स्मारकाच्या ठिकाणी बसवण्यात आला. सकाळी सर्वत्र वाऱ्यासारखी ही बातमी पसरली. यांनतर सकाळी निर्भयाच्या नातेवाईकांनी हा पुतळा पांढऱ्या कापडाने झाकून ठेवला. हा पुतळा भय्यूजी माहराज यांचे शिष्य कृष्णा शेळके व पोलिस पाटील समीर जगताप (दोघेही रा. कर्जत) आणि दादा पाटील (बुलडाणा) यांनी बसवला आहे, असा
आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे.
या संदर्भात विचारणा केली असता मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, हे स्मारक नाही आमची मुलगी आहे. तिची आठवण म्हणून आम्ही समाधी बांधली आहे व त्याच्यावर आम्ही पुतळा बसवला आहे. यामध्ये कोणाचा काही संबंध नाही. भविष्यात आम्ही येथे आमच्या मुलीचे मंदिरही बांधणार आहोत. आम्हाला सर्वांनी खूप आधार दिला आहे. कोणाची भावना दुखवावी, असा आमचा हेतू नाही. कृपया कोणी गैरसमज करू नये, आज एक वर्ष झाले. आम्ही लेकराच्या आठवणीने जगत आहोत. आम्ही अन्न पाणी निट घेत नाही, ती आमच्या डोळ्यासमारे राहावी यासाठी ही समाधी आम्हीच बांधली आहे. विनाकारण कोणाचे नाव घेऊ नये व आपली एकजुट कायम ठेवावी. त्या नराधमांना फाशी व्हावी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावी, अशी आमची सर्व बांधवाना आणि भगिनींना विनंती आहे.
कोट ः
कोपर्डी येथे निर्भयाच्या समाधीवर तिच्या नातेवाईकांनी गुरुवारी रात्री पुतळा बसवला आहे; मात्र, तो त्यांनी झाकून ठेवला आहे. त्या समाधीस पोलिस संरक्षण दिले आहे; मात्र, त्या निर्भयाच्या कुटुंबीयांची भावना असल्याने त्याचा विचार सर्वांनी करावा व कोणी तणाव वाढेल असे कृत्य करू नये. कायदा हातामध्ये घेतल्यास कारवाई करू.
- सुर्दशन मुंडे, विभागीय पोलिस अधिकारी
कोपर्डी येथील समाधी की स्मारक याबद्दल सुरू असलेला वाद हे केवळ राजकारण आणि श्रेय घेण्याची धडपड आहे; मात्र, त्या निर्भयाचे कुटुंबांचा विचार काय आहे, याचा विचार कोणी करण्यास तयार नाही व भय्यूजी महाराज हे राष्ट्रसंत आहेत ते पण आपलेच आहेत. त्यांनी कोपर्डीच्या मुलींसाठी मोफत दोन गाड्या दिल्या आहेत व त्या वर्षभर सुरू आहेत. या शिवाय कोपर्डी गावासाठी त्यांनी विकासाचे मॉडेल तयार केले आहे. याचा विचार कोण करण्यास तयार नाही.
- दीपक शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, बहिरोबावाडी