अ‍ॅपशहर

पाच पाणीयोजनांना ‘महावितण’ची नोटीस

वीजबिल थकवणाऱ्या पाच पाणीयोजनांना नव्याने नोटिसा बजावल्या आहेत. याअगोदर सहा पाणीयोजनांची वीज तोडण्यात आल्याने हा विषय चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Maharashtra Times 25 Mar 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम notice to water scheme
पाच पाणीयोजनांना ‘महावितण’ची नोटीस


जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीजबिलांचा प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाही. पाणीयोजनांचे थकलेले बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महावितणने आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजबिल थकवणाऱ्या पाच पाणीयोजनांना नव्याने नोटिसा बजावल्या आहेत. याअगोदर सहा पाणीयोजनांची वीज तोडण्यात आल्याने हा विषय चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

जिल्ह्यातील पाणीयोजनांचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकले आहे. महावितरणकडून वारंवार सांगूनही बिले भरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बिल भरण्यासाठी महावितरणकडून आता दबाव वाढू लागला आहे. वीजबिल थकवणाऱ्या पाणीयोजनांना अगोदर नोटिसा पाठवल्या जात आहेत. तरीदेखील बिल भरले नाही तर कनेक्शन तोडले जात आहे. महावितरणने या अगोदर शहरटाकळी, बोधेगाव, गळनिंब शिरसगाव, ओतूर, कान्हूरपठार या योजनांचे कनेक्शन तोडले आहे. त्यानंतर आता कुरणवाडी, बारागाव नांदूर, शेवगाव पाथर्डी, तळेगाव दिघे, कान्हूरपठार या योजनांना नव्याने नोटिसा बजावल्या आहेत. या योजनांकडून बिले न भरल्यास वीज कनेक्शन तोडले जाणार आहे. असे झाल्यास ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज