अ‍ॅपशहर

राजकारण गेलं चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे: फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला असला तरी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टीकेच्या तोफा डागण्याची मोहीम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरूच ठेवली आहे.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2022, 2:40 pm
अहमदनगर: 'राजकारण गेलं चुलीत. मात्र, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे. पण त्याला बट्टा लागतोय. ही अवस्था महाराष्ट्रानं कधीही पाहिली नव्हती,' अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) हल्लाबोल केला. शनिवारी शिर्डी विमानतळावर आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस


वाचा: पेट्रोल, डिझेलच्या दराचा आकडा सांगत राष्ट्रवादीचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल

शुक्रवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला. या अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली होती. महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होता. 'पेन ड्राइव्ह बॉम्ब' टाकून सरकारला हादराही दिला होता. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट सामनाही रंगला. यामुळे हे अधिवेशन इतर कामकाजापेक्षा राजकीय कुरघोड्यांसाठीच गाजले.

वाचा: कामगारांना ही शेवटी संधी... एसटी संपावर अजित पवार यांचं मोठं विधान

या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘राज्यात जे काही सुरू आहे, त्यासंबंधी सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता मला राजकारणापेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता आहे. राज्यात सध्या 'नो गव्हर्नन्स' अशीच अवस्था पहायला मिळत आहे. अशी अवस्था राज्यानं कधीही पाहिली नव्हती. राजकारण जाईल चुलीत. महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे. येथील गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे, त्याला कुठेही बट्टा लागता काम नये, याची खरी काळजी करण्याची गरज आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.

वाचा: धक्कादायक! कौटुंबिक वादातून निवृत्त लाइनमनने उचलले टोकाचे पाऊल, घरासमोरच...
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज