अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: विखे पाटील

मराठा समाजाचे आंदोलन पेटण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत आहेत, अशा शब्दात कठोर टीकास्त्र सोडत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2018, 9:34 pm
शिर्डी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vikhe-patil


मराठा समाजाचे आंदोलन पेटण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत आहेत, अशा शब्दात कठोर टीकास्त्र सोडत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा समाजाने शांततामय मार्गाने मोर्चे काढल्यानंतर सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखून आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करायला हवी होती, असे सांगत हे सरकार आरक्षणविरोधी असल्याने केवळ मराठाच नाही, तर मुस्लीम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

विधायक मार्गाने आंदोलन करून सरकार दखल घेत नसल्यामुळेच मराठा समाजाला आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरावे लागल्याचे विखे पाटील म्हणाले. मराठा आंदोलन आक्रमक होत असल्याने सरकारने सामोपचाराने आंदोलकांशी चर्चा करायला हवी होती, त्यांना ठोस आश्वासन द्यायला हवे होते, मात्र तसे न करता मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर वक्तव्य करून मराठा समाजाला नाहक दुखावले आहे. याचमुळे मराठा आंदोलक संतप्त झाले असेही विखे पाटील पुढे म्हणाले.

सुप्रिया सुळेंचीही राजीनाम्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज