अ‍ॅपशहर

सेंद्रीय शेतीच एकमेव पर्याय

'आत्मा'चे प्रकल्प संचालक बऱ्हाटे यांचे मतम टा प्रतिनिधी, नगर सध्याच्या धावपळीच्या जमान्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे...

Maharashtra Times 13 Jul 2018, 4:00 am

'आत्मा'चे प्रकल्प संचालक बऱ्हाटे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नगर

सध्याच्या धावपळीच्या जमान्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. रोजच्या आहाराच्या सवयींमुळेही आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे निरोगी जीवनासाठी सेंद्रीय शेतीच एकमेव पर्याय आहे, असे मत 'आत्मा'चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी व्यक्त केले.

राळेगणसिद्धी येथे सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या वांग्याच्या शेतीची बऱ्हाटे यांनी पाहणी केली. या वेळी शेतकरी संदीप पटारे, देवेंद्र जाधव, बापू होले, उमेश डोईफोडे उपस्थित होते.

सेंद्रीय शेतीसाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकऱ्यांनाही आता याचे महत्त्व पटू लागले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यास त्यांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल. उत्पादन खर्च कमी व उत्पन्न जास्त हीच खरी सेंद्रीय शेतीची संकल्पना आहे, असे बऱ्हाटे यांनी सांगितले. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून वांग्याच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळाले आहे. याआधी केलेल्या तुरीतूनही चांगले उत्पन्न मिळाले होते, असे शेतकरी संदीप पटारे यांनी सांगितले. सेंद्रीय शेतीसाठी आत्मा विभागाकडूनही प्रयत्न केले जात आहे. शेतकऱ्यांना या शेतीबाबत माहिती दिली जात आहे. जिल्हाभरात याबाबत विभागाकडून जनजागृतीचे काम सुरू असते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज