अ‍ॅपशहर

दिल्लीगेट रस्त्यावर पुन्हा खड्डे

शहराच्या मध्यवर्ती भागातील दिल्ली गेट रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या वीस दिवसापूर्वीच सिद्धीबागेसमोरील रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. परंतु नेहमीप्रमाणेच रस्ता जागोजागी उखडला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे.

Maharashtra Times 20 Oct 2017, 10:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pathhole at delhi gate road
दिल्लीगेट रस्त्यावर पुन्हा खड्डे


शहराच्या मध्यवर्ती भागातील दिल्ली गेट रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या वीस दिवसापूर्वीच सिद्धीबागेसमोरील रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. परंतु नेहमीप्रमाणेच रस्ता जागोजागी उखडला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. खड्डे पडून खडी रस्त्यावर पडली असल्याने उत्सवाच्या काळात येथील रस्त्यावर अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्ता दुरुस्ती सातत्याने करण्यात येत असून देखील खड्डे पुन्हा उपस्थित होत असल्याने, मनपाच्या कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांची दुर्दशा झालेली असतानाच शहरांतर्गत रस्त्यांची देखील चाळण झालेली आहे. दर्जेदार रस्त्यांसह शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे. परंतु पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या निष्काळजी व उदासीन कारभारामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. उत्सव काळ सुरू असल्याने सर्वत्र खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे, परंतु रस्त्यांची अवस्था पाहता रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत आहे. दिल्लीगेट ते अप्पू हत्ती चौक रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दररोज याच रस्त्याने जावे लागते. परंतु या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. अवघ्या वीस दिवसांपूर्वीच सिद्धीबागेसमोरील रस्त्यावरील खड्डे मनपाच्या वतीने बुजविण्यात आले होते. मात्र येथे पाणी साचत असल्याने पुन्हा खड्डे तयार होतात. पावसाळ्यात दुचाकी चालकांना मोठी कसरत करत पाण्यातून वाहने चालवावी लागतात. वारंवार दुरुस्त करण्यात येत असलेल्या या रस्त्याची परिस्थिती पुन्हा जैसे थी बनते आहे. तसेच कॉलेजसमोरील स्पीड ब्रेकरही फोडले आहे, त्यामुळे वाहनांच्या वेगाला मर्यादा राहिलेली नाही. कॉलेजसमोरुन भरधाव वाहने चालवण्याचे प्रमाण येथे वाढले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा वाहनांचा अपघात होतात. तसेच यामुळे छोटे-मोठे वाद देखील उपस्थित होतात. मनपाच्या वतीने कोणत्याही ठोस उपाययोजना न करता केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते. त्यामुळे शहरातील सर्वच प्रमुख अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली. वारंवार खराब होत असलेल्या रस्त्याची मनपाकडून दाखल घेतली जात नसल्याने त्याचा त्रास नगरकरांना दररोज सहन करावा लागतो आहे. रस्त्यावरील खड्डे बुजुवून हा प्रश्न सुटणार नसून, येथे कायम स्वरूपी पक्का रस्ता करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अनेकदा डागडुजी करूनही दिल्लीगेट परिसरातील रस्ते उखडले जातात. त्यामुळे येथील परिसरात लहान-मोठय़ा अपघात घडतात. उत्सव काळात नागरिकांना होणार त्रास लक्षात घेऊन मनपाने रस्ता दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

- बबन सरोदे, नागरिक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज