अ‍ॅपशहर

जिल्ह्यात लावणार १९ लाख रोपे

पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्यात शुक्रवारी (१ जुलै) या एकाच दिवसांत दोन कोटी रोपे लावली जाणार आहेत. जिल्ह्यास १७ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रोपे लागवडीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Maharashtra Times 1 Jul 2016, 3:00 am
नगर:पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्यात शुक्रवारी (१ जुलै) या एकाच दिवसांत दोन कोटी रोपे लावली जाणार आहेत. जिल्ह्यास १७ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रोपे लागवडीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वनविभागाच्या वेबसाइटवर १४ लाख ४४ हजार, इतर सरकारी कार्यालये, सेवाभावी संस्था, खासगी व्यक्ती यांनी सव्वा पाच लाख रोपे लागवडीची नोंदणी केली आहे. उद्दिष्टात वाढ झाल्याने आता एका दिवसात १९ लाख ६८ हजार रोपे लावली जाणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम plantation in nagar district
जिल्ह्यात लावणार १९ लाख रोपे


राज्य सरकारने एक जुलै रोजी राज्यात दोन कोटी रोपे लागवडीचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात सरकारी कार्यालयांसह सेवाभावी संस्था, शाळा, कॉलेज, नागरिकांकडूनही रोपे लागवड केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यास उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते. नगर जिल्ह्यास १७ लाख रोपांचे उद्दिष्ट मिळाले होते. परंतु, खासगी व्यक्ती, सेवाभावी संस्था यांनी वनविभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करुन रोपे लागवडीची इच्छा व्यक्त केल्याने आकडा वाढला आहे. लागवड केलेल्या रोपांची संख्या दर दोन तासाला वेबसाइटवर अपलोड केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय व सामाजिक वनीकरण विभाग यांच्यावतीने नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज