म. टा. प्रतिनिधी, नगर
राज्य सरकारच्या चार कोटी वृक्ष लागवड योजनेत नगर जिल्ह्यात सरकारी यंत्रणांनी तीस लाख रोपांची लागवड केली आहे. रोपे लागवडीची माहिती वनविभागाच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे. लागवडीची कामे झाली असली तरी या रोपांच्या स्थितीचा वर्षातून दोनदा आढावा घेण्याचे नवे काम देण्यात आले आहे. यासाठी सरकारने मोबाइल अॅप तयार केले असून या अॅपवर मे व ऑक्टोबर या दोन महिन्यात रोपांच्या स्थितीची माहिती भरणे बंधनकारक केले आहे.
वनविभाग, ग्रामपंचायत आणि अन्य सरकारी विभागांनी ७ जुलैपर्यंत ३० लाख रोपे लावली आहेत. या उपक्रमाचे नियंत्रण वनविभागाकडे होते. वनविभागाने ग्रामपंचायतींना मोफत रोपे दिली. तर इतर सरकारी विभागांना सवलतीच्या दरात रोपे दिली. रोपे लागवडीच्या साईट निश्चित करण्यात आल्या होत्या. खड्डे खोदल्याची माहिती मिळाल्यानंतर रोपे देण्यात आली होती. कोणत्या विभागास किती रोपे दिली, विभाग किती रोपे लागवड करणार आहे याची माहिती ऑनलाइन भरण्यात आली. त्यानंतर ७ जुलैपर्यंत कोणत्या विभागाने किती रोपे लावली याची माहितीही अपलोड झाली आहे. रोपे लागवडीनंतर या रोपांची स्थिती कळवावी लागणार आहे. या कामासाठी सरकारने मोबाइल अॅप तयार केले आहे. समन्वय अधिकाऱ्यांना अॅपमध्ये रोपांची स्थिती कळवावी लागणार आहे. वर्षभरातून दोनदा या पद्धतीने माहिती भरण्याचे काम करावे लागणार आहे. याबाबत अद्याप नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.
राज्य सरकारच्या चार कोटी वृक्ष लागवड योजनेत नगर जिल्ह्यात सरकारी यंत्रणांनी तीस लाख रोपांची लागवड केली आहे. रोपे लागवडीची माहिती वनविभागाच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे. लागवडीची कामे झाली असली तरी या रोपांच्या स्थितीचा वर्षातून दोनदा आढावा घेण्याचे नवे काम देण्यात आले आहे. यासाठी सरकारने मोबाइल अॅप तयार केले असून या अॅपवर मे व ऑक्टोबर या दोन महिन्यात रोपांच्या स्थितीची माहिती भरणे बंधनकारक केले आहे.
वनविभाग, ग्रामपंचायत आणि अन्य सरकारी विभागांनी ७ जुलैपर्यंत ३० लाख रोपे लावली आहेत. या उपक्रमाचे नियंत्रण वनविभागाकडे होते. वनविभागाने ग्रामपंचायतींना मोफत रोपे दिली. तर इतर सरकारी विभागांना सवलतीच्या दरात रोपे दिली. रोपे लागवडीच्या साईट निश्चित करण्यात आल्या होत्या. खड्डे खोदल्याची माहिती मिळाल्यानंतर रोपे देण्यात आली होती. कोणत्या विभागास किती रोपे दिली, विभाग किती रोपे लागवड करणार आहे याची माहिती ऑनलाइन भरण्यात आली. त्यानंतर ७ जुलैपर्यंत कोणत्या विभागाने किती रोपे लावली याची माहितीही अपलोड झाली आहे. रोपे लागवडीनंतर या रोपांची स्थिती कळवावी लागणार आहे. या कामासाठी सरकारने मोबाइल अॅप तयार केले आहे. समन्वय अधिकाऱ्यांना अॅपमध्ये रोपांची स्थिती कळवावी लागणार आहे. वर्षभरातून दोनदा या पद्धतीने माहिती भरण्याचे काम करावे लागणार आहे. याबाबत अद्याप नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.