म. टा. प्रतिनिधी, नगर
‘सांगली सारखे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच २४ नोव्हेंबरला राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून त्यामध्येही योग्य त्या सूचना देण्यात येतील,’ असे राज्याचे पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथुर यांनी सांगितले.
बुधवारी माथूर यांनी नगरला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठकही त्यांनी घेतली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘सांगलीतील घटना वाईट आहे. पोलिसांनी अधिकाराचा वापर करून चुकीचे काम केले. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय यामध्ये दोषी असणाऱ्या सहाजणांना पोलिस खात्यातून काढून टाकण्यात आले आहे. राज्यात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. आरोपींना मारहाण न करता तपास करण्यास सांगितले आहे.’ गुन्हेगारी संदर्भात बोलताना माथुर म्हणाले की, ‘गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असले तरी जबरी चोरी, दरोडे हे वाढत आहेत. हे रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नगर जिल्ह्याचा विचार करता या जिल्ह्यामध्ये पोलिस खात्यातील मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला १०० ते १५० होमगार्ड देण्यात येणार आहेत. शिर्डी येथील पोलिसांचे मनुष्यबळ वाढवण्याचे प्रयत्न आहेत.'
यावेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक घनशाम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस अधिकारी उपस्थित होते.
'महिला व मुलांवर अत्याचार होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने खास युनिट तयार केले आहे. या युनीटची बैठक घेतली आहे,' असेही माथुर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 'अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या शोध घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. तसेच त्यांची कोणत्याही क्षणी तपासणी करण्यात येईल. '
घरासाठी मागेल त्याला कर्ज
'पोलिस कर्मचाऱ्यांना एकाचवेळी पंधरा लाख रुपयांपर्यंत घरासाठी कर्ज देण्याची व्यवस्था केली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मागेल त्याला कर्ज देता येईल. याशिवाय जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,' असेही स्पष्ट केले.
‘सांगली सारखे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच २४ नोव्हेंबरला राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून त्यामध्येही योग्य त्या सूचना देण्यात येतील,’ असे राज्याचे पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथुर यांनी सांगितले.
बुधवारी माथूर यांनी नगरला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठकही त्यांनी घेतली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘सांगलीतील घटना वाईट आहे. पोलिसांनी अधिकाराचा वापर करून चुकीचे काम केले. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय यामध्ये दोषी असणाऱ्या सहाजणांना पोलिस खात्यातून काढून टाकण्यात आले आहे. राज्यात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. आरोपींना मारहाण न करता तपास करण्यास सांगितले आहे.’ गुन्हेगारी संदर्भात बोलताना माथुर म्हणाले की, ‘गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असले तरी जबरी चोरी, दरोडे हे वाढत आहेत. हे रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नगर जिल्ह्याचा विचार करता या जिल्ह्यामध्ये पोलिस खात्यातील मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला १०० ते १५० होमगार्ड देण्यात येणार आहेत. शिर्डी येथील पोलिसांचे मनुष्यबळ वाढवण्याचे प्रयत्न आहेत.'
यावेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक घनशाम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस अधिकारी उपस्थित होते.
'महिला व मुलांवर अत्याचार होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने खास युनिट तयार केले आहे. या युनीटची बैठक घेतली आहे,' असेही माथुर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 'अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या शोध घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. तसेच त्यांची कोणत्याही क्षणी तपासणी करण्यात येईल. '
घरासाठी मागेल त्याला कर्ज
'पोलिस कर्मचाऱ्यांना एकाचवेळी पंधरा लाख रुपयांपर्यंत घरासाठी कर्ज देण्याची व्यवस्था केली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मागेल त्याला कर्ज देता येईल. याशिवाय जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,' असेही स्पष्ट केले.