म. टा. प्रतिनिधी, नगर
पाऊस बंद होऊन आता दोन ते अडीच महिने झाले असतानाही सावेडीतील वैदूवाडीच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साठले आहे. मात्र, परिसरातील पिण्याच्या पाण्याची लाइन कोठे फुटली आहे का, याची तपासणी करण्याचीही तसदी कोणी घेतलेली नाही. सावेडीसह अन्य उपनगरांतील खड्ड्यांची अवस्था सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी मांडूनही मनपाच्या प्रशासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसू लागले आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यामध्ये साचलेले पाणी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमा झालेल्या बारीक खडीतून जोरात वाहन गेल्यानंतर उडणारी धुळीसह विविध समस्यांना सावेडी उपनगरातून प्रवास करताना वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, उपनगरातील रस्ते दुरुस्ती करण्याचे काम वेगाने करण्याचा प्रयत्न मनपाद्वारे केला जात नसल्याने वेळेवर घरपट्टी व पाणीपट्टीसह अन्य कर भरूनही उपनगरातील नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे
सावेडी उपनगरातील बहुतांश नागरिक हे मनपाचे विविध कर नियमित व वेळेवर भरतात. मनपाला सर्वात जास्त उत्पन्न सावेडी उपनगरातील मिळत असल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्यानंतरही येथील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यास मनपा प्रशासन टाळाटाळ करीत असल्याची स्थिती आहे. प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी, सावेडी नाका ते अहिल्यानगरी चौक तसेच भिस्तबाग चौक ते पवननगर या उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते.
खड्ड्यांमध्ये पाणी
नगर-मनमाड महामार्ग व पाइपलाइन रोड या दोन मार्गांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून सावेडी नाका ते अहिल्यानगरी चौक-भिस्तबाग चौक हा रस्ता ओळखला जातो. पाइपलाइन रोडवर पुलाचे काम सुरू असल्यामुळे सध्या विळदघाट परिसरातील विखे कॅम्पसमध्ये जाणारे विद्यार्थी, नागापूर एमआयडीसीमध्ये जाणारे कामगार पाइपलाइन रोडवर येण्यासाठी सावेडी नाका ते अहिल्यानगरी चौक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर चोवीस तास रहदारी असते. परंतु, सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्याचा वाहनचालकांना त्रास होत आहे. अहिल्यानगरी चौकाजवळील खड्ड्यामध्ये तर परिसरातील ड्रेनेजचे पाणी साचते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने येथे अपघात होतात. येथून प्रवास करताना खराब रस्त्यामुळे नागरिकांना धुळीचाही त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. दरम्यान, उपनगरातील सर्वात दर्जेदार रस्ता म्हणून ओळख असणाऱ्या प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी या रस्त्याचीदेखील दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे.
पाऊस बंद होऊन आता दोन ते अडीच महिने झाले असतानाही सावेडीतील वैदूवाडीच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साठले आहे. मात्र, परिसरातील पिण्याच्या पाण्याची लाइन कोठे फुटली आहे का, याची तपासणी करण्याचीही तसदी कोणी घेतलेली नाही. सावेडीसह अन्य उपनगरांतील खड्ड्यांची अवस्था सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी मांडूनही मनपाच्या प्रशासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसू लागले आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यामध्ये साचलेले पाणी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमा झालेल्या बारीक खडीतून जोरात वाहन गेल्यानंतर उडणारी धुळीसह विविध समस्यांना सावेडी उपनगरातून प्रवास करताना वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, उपनगरातील रस्ते दुरुस्ती करण्याचे काम वेगाने करण्याचा प्रयत्न मनपाद्वारे केला जात नसल्याने वेळेवर घरपट्टी व पाणीपट्टीसह अन्य कर भरूनही उपनगरातील नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे
सावेडी उपनगरातील बहुतांश नागरिक हे मनपाचे विविध कर नियमित व वेळेवर भरतात. मनपाला सर्वात जास्त उत्पन्न सावेडी उपनगरातील मिळत असल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्यानंतरही येथील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यास मनपा प्रशासन टाळाटाळ करीत असल्याची स्थिती आहे. प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी, सावेडी नाका ते अहिल्यानगरी चौक तसेच भिस्तबाग चौक ते पवननगर या उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते.
खड्ड्यांमध्ये पाणी
नगर-मनमाड महामार्ग व पाइपलाइन रोड या दोन मार्गांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून सावेडी नाका ते अहिल्यानगरी चौक-भिस्तबाग चौक हा रस्ता ओळखला जातो. पाइपलाइन रोडवर पुलाचे काम सुरू असल्यामुळे सध्या विळदघाट परिसरातील विखे कॅम्पसमध्ये जाणारे विद्यार्थी, नागापूर एमआयडीसीमध्ये जाणारे कामगार पाइपलाइन रोडवर येण्यासाठी सावेडी नाका ते अहिल्यानगरी चौक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर चोवीस तास रहदारी असते. परंतु, सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्याचा वाहनचालकांना त्रास होत आहे. अहिल्यानगरी चौकाजवळील खड्ड्यामध्ये तर परिसरातील ड्रेनेजचे पाणी साचते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने येथे अपघात होतात. येथून प्रवास करताना खराब रस्त्यामुळे नागरिकांना धुळीचाही त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. दरम्यान, उपनगरातील सर्वात दर्जेदार रस्ता म्हणून ओळख असणाऱ्या प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी या रस्त्याचीदेखील दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे.