अ‍ॅपशहर

​ खड्डे दुरुस्तीला ‘बायपास’

नगर शहर बायपास रस्ता उखडला असून, खड्ड्यामधून अवजड वाहने जात आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १८ कोटींचा निधी मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी दीड महिना लागणार असून, पूर्ण रस्ता दुरुस्त करण्यासाठी सहा महिन्यापर्यंत कालावधी जाणार असल्याने पूर्ण पावसाळ्यात रस्त्या खड्ड्यात राहणार आहे.

Maharashtra Times 24 Jul 2017, 3:04 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम poths are not repaired
​ खड्डे दुरुस्तीला ‘बायपास’

नगर शहर बायपास रस्ता उखडला असून, खड्ड्यामधून अवजड वाहने जात आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १८ कोटींचा निधी मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी दीड महिना लागणार असून, पूर्ण रस्ता दुरुस्त करण्यासाठी सहा महिन्यापर्यंत कालावधी जाणार असल्याने पूर्ण पावसाळ्यात रस्त्या खड्ड्यात राहणार आहे.
नगर शहर बायपास रस्ता २९ किलोमीटर अंतराचा असून, गेल्या वर्षभरापासून या रस्त्यावरील मोठ-मोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला आहे. परिणामी रस्त्यावर केवळ खड्डे आणि माती शिल्लक राहिली आहे. त्यामुळे मातीच्या रस्त्यातून वाहने चालवावी लागत आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यापासून ही परिस्थिती असून, या पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती होऊ शकली नाही. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मे महिन्यात १७ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी टेंडर काढण्यात आलेले नाही. या कामाचे टेंडर काढण्यासाठी आणखी आठवडा जाणार असून, त्यानंतर महिन्याभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर ऑगस्टनंतर या रस्त्याचे काम सुरू होऊ शकते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातून मिळाली आहे. विळद घाट पायथ्यापासून ते कल्याण हायवेपर्यंत उखडलेल्या पाच किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती पहिल्यांदा केली जाणार आहे. केवळ रस्त्यावर खडीकरण करता येणार असून, पावसाळ्यानंतर डांबरीकरण होणार आहे. पूर्ण २९ किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत लागणार आहे.

त्यामुळे अवजड वाहनांना खड्ड्यातुनच वाट काढावी लागणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत बायपासला अवजड वाहतूक वळविण्याचे काम ही वाहतूक पोलिसांनाच करावे लागणार आहे. रात्रीच्या वेळी शहरातून सोडण्यात येणाऱ्या अवजड वाहनांचा अडथळा नगरकरांना सहन करावा लागणार आहे. दरम्यान, बायपास रस्ते हे राष्ट्रीय महामार्गात घेण्यात आले असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी बायपास रस्त्याच्या जवळ ज्या शेतकऱ्याची जमीन आहे ती जमिन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज