म. टा. वृत्तसेवा, श्रीगोंदे
देशातील काळा पैसा बाहेर काढायचा आणि सामान्य जनतेचे कल्याण करायचे या गोंडस नावाखाली मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीने काळा पैसा बाहेर आलाच नाही. उलट मुठभर लोकांच्या काळ्या धनाचं पांढर धन केले. नोटाबंदीने धनदांडग्याचे वाटोळे न होता सामान्य नागरिकांची आर्थिक नसबंदी मोदी सरकारने केल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.
बेलवंडी येथील सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे अध्यक्षस्थानी होते. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, महिला बाल कल्याण समितीच्य सभापती अनुराधा नागवडे, विश्वास थोरात, हरिदास शिर्के, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब गिरमकर, प्रशांत दरेकर, अमृत पितळे, धनसिंग भोयटे, संजय जामदार, अर्चना गोरे आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफीचे आमिष दाखवले; परंतु, शेतकऱ्यांची कर्जमाफीची खोटी प्रमाणपत्रे देऊन ऐतिहासिक फसवणूक केली आहे. आता या सरकारला जनता ऐतिहासिक चपराक देणार आहे. आघाडीचे सरकार असताना नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १०० कोटींचे अनुदान दिले होते. यामध्ये श्रीगोदे तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळात २७ कोटी ठिबकसाठी, ५ कोटी पीक विम्यापोटी, शेततळ्यासाठी ७ कोटी अनुदान देण्याचे काम केले आहे. पण भाजप सरकारने किती मदत केली. त्यामुळे या सरकारचा कडेलोट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिवाजीराव नागवडे, अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, तुकाराम दरेकर, दिनेश इथापे, सरस्वती डाके यांची या वेळी भाषणे झाली.
देशातील काळा पैसा बाहेर काढायचा आणि सामान्य जनतेचे कल्याण करायचे या गोंडस नावाखाली मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीने काळा पैसा बाहेर आलाच नाही. उलट मुठभर लोकांच्या काळ्या धनाचं पांढर धन केले. नोटाबंदीने धनदांडग्याचे वाटोळे न होता सामान्य नागरिकांची आर्थिक नसबंदी मोदी सरकारने केल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.
बेलवंडी येथील सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे अध्यक्षस्थानी होते. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, महिला बाल कल्याण समितीच्य सभापती अनुराधा नागवडे, विश्वास थोरात, हरिदास शिर्के, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब गिरमकर, प्रशांत दरेकर, अमृत पितळे, धनसिंग भोयटे, संजय जामदार, अर्चना गोरे आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफीचे आमिष दाखवले; परंतु, शेतकऱ्यांची कर्जमाफीची खोटी प्रमाणपत्रे देऊन ऐतिहासिक फसवणूक केली आहे. आता या सरकारला जनता ऐतिहासिक चपराक देणार आहे. आघाडीचे सरकार असताना नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १०० कोटींचे अनुदान दिले होते. यामध्ये श्रीगोदे तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळात २७ कोटी ठिबकसाठी, ५ कोटी पीक विम्यापोटी, शेततळ्यासाठी ७ कोटी अनुदान देण्याचे काम केले आहे. पण भाजप सरकारने किती मदत केली. त्यामुळे या सरकारचा कडेलोट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिवाजीराव नागवडे, अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, तुकाराम दरेकर, दिनेश इथापे, सरस्वती डाके यांची या वेळी भाषणे झाली.