अहमदनगर
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याचे जे खोटे आश्वासन दिले होते, त्यातूनच मला न्याय योजना सुचली. नागरिकांच्या खात्यात सरकार अशा पद्धतीने पैसे भरू शकत असेल, तर ते कसे आणि किती असावेत, यासाठी आमची टीम कामाला लागली आणि त्यातून वास्तववादी न्याय योजना अस्तित्वात आली,' अशी माहिती काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये आयोजित सभेत गांधी बोलत होते. या वेळी पक्षाचे राज्याचे प्रभारी मल्ल्किार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, डॉ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.
गांधी म्हणाले, 'मोदींनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख भरण्याचे आश्वासन दिले होते. ते खोटे निघाल्यावर त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र, मला त्यातून एक प्रश्न पडला, की खरेच असे सरकार गरिबांच्या खात्यात पैसे भरू शकते का? हा प्रश्न घेऊन मी आमच्या टीमला कामाला लावले. मान्यवर अर्थतज्ज्ञांना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा; पण येताना दोन गोष्टी नक्की घेऊन या. एक म्हणजे किती पैसे भरता येतील?, आणि याचा अर्थव्यवस्थेवर काही विपरित परिणाम होईल का?. त्यानुसार टीम गेली. पाच महिने काम केले आणि ते परत आले. त्यांनी ७२ हजार रुपये २५ कोटी लोकांच्या खात्यात भरण्याची न्याय योजना तयार करून आणली होती. मुख्य म्हणजे याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर उलटा नव्हे; तर सकारात्मक परिणाम होणार आहे. अर्थव्यवस्थेला इंधन देणारी ही योजना आहे. कारण नोटाबंदी आणि 'जीएसटी'मुळे खरेदी घटली आहे. त्याचा परिणाम होऊन व्यापार, उद्योग बंद पडले, त्यातून बेरोजगारी वाढली. जर लोकांच्या खात्यात पैसे आले, तर ते पुन्हा खरेदी करण्यास सुरुवात करतील आणि बंद पडलेले व्यापार, उद्योग आणि त्यातील नोकऱ्या सुरू होतील. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २०१९ निवडणुकीनंतर कर्जासाठी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जाणार नाही. सरकार कायदा बनवेल. शेतकऱ्यांना कर्जासाठी जेलमध्ये टाकले जाणार नाही. लोकसभेला बजेटपूर्वी शेतकऱ्यांचे बजेट सादर केले जाणार आहे. निवडणूक जिंकल्यानंतर शेतकऱ्यांचे बजेट सादर केले जाणार आहे. कर्जमाफ करून शेतकऱ्यांना पैसे देणार आहे. मोदींनी सांगितले होते, 'दोन करोड लोकांना रोजगार दिला जाईल,' परंतु रोजगार देण्याएवजी मोदींनी रोजगार हिरावून घेतले आहेत. आता आम्ही एका वर्षांत २२ लाख नोकऱ्या मिळवून देणार आहोत.'
आधी आमदारकीचा राजीनामा द्या : अशोक चव्हाण
'पक्षातील काही गद्दार लोक पक्षात असूनही शिवसेनेच्या प्रचारसभेला उपस्थित रहातात. त्या गद्दारांनी आधी पक्षामुळे मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, मग जिकडे जायचे तिकडे जावे,' असे आव्हान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. त्यांनी भाजपसोबत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली.
मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत: पृथ्वीराज चव्हाण
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. यंदा भाजपचा पराभव अटळ आहे. हे सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले . या सरकारमुळे आमच्या देशाचे ४२ जवानांचा हकनाक बळी गेला.
भाजपचं निर्लज्ज सरकार: छगन भुजबळ
भाजप सरकार निर्लज्ज सरकार आहे.... कर्जमाफी हा महाघोटाळा आहे... राम मंदिर करा अन्यथा आम्ही ते बांधू... पहारेकरी चोर आहेत हे सर्व म्हणणारे उद्धव ठाकरे आज त्यांच्या त्यांच्या मांडीला मांडी का लावून बसले आहेत ? मोदी नाशिकला आले व म्हणाले चंपा शष्टीला प्याज खातो...' मोदीजी आम्ही फक्त कांदेच खातो का? असं त्यांना विचारलं पाहिजे. 'योगी व मोदी का एकही नारा ना घर बसा हमरा ना बसने देंगे तुम्हारा '! असही भुजबळ म्हणाले.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याचे जे खोटे आश्वासन दिले होते, त्यातूनच मला न्याय योजना सुचली. नागरिकांच्या खात्यात सरकार अशा पद्धतीने पैसे भरू शकत असेल, तर ते कसे आणि किती असावेत, यासाठी आमची टीम कामाला लागली आणि त्यातून वास्तववादी न्याय योजना अस्तित्वात आली,' अशी माहिती काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये आयोजित सभेत गांधी बोलत होते. या वेळी पक्षाचे राज्याचे प्रभारी मल्ल्किार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, डॉ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.
गांधी म्हणाले, 'मोदींनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख भरण्याचे आश्वासन दिले होते. ते खोटे निघाल्यावर त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र, मला त्यातून एक प्रश्न पडला, की खरेच असे सरकार गरिबांच्या खात्यात पैसे भरू शकते का? हा प्रश्न घेऊन मी आमच्या टीमला कामाला लावले. मान्यवर अर्थतज्ज्ञांना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा; पण येताना दोन गोष्टी नक्की घेऊन या. एक म्हणजे किती पैसे भरता येतील?, आणि याचा अर्थव्यवस्थेवर काही विपरित परिणाम होईल का?. त्यानुसार टीम गेली. पाच महिने काम केले आणि ते परत आले. त्यांनी ७२ हजार रुपये २५ कोटी लोकांच्या खात्यात भरण्याची न्याय योजना तयार करून आणली होती. मुख्य म्हणजे याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर उलटा नव्हे; तर सकारात्मक परिणाम होणार आहे. अर्थव्यवस्थेला इंधन देणारी ही योजना आहे. कारण नोटाबंदी आणि 'जीएसटी'मुळे खरेदी घटली आहे. त्याचा परिणाम होऊन व्यापार, उद्योग बंद पडले, त्यातून बेरोजगारी वाढली. जर लोकांच्या खात्यात पैसे आले, तर ते पुन्हा खरेदी करण्यास सुरुवात करतील आणि बंद पडलेले व्यापार, उद्योग आणि त्यातील नोकऱ्या सुरू होतील. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २०१९ निवडणुकीनंतर कर्जासाठी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जाणार नाही. सरकार कायदा बनवेल. शेतकऱ्यांना कर्जासाठी जेलमध्ये टाकले जाणार नाही. लोकसभेला बजेटपूर्वी शेतकऱ्यांचे बजेट सादर केले जाणार आहे. निवडणूक जिंकल्यानंतर शेतकऱ्यांचे बजेट सादर केले जाणार आहे. कर्जमाफ करून शेतकऱ्यांना पैसे देणार आहे. मोदींनी सांगितले होते, 'दोन करोड लोकांना रोजगार दिला जाईल,' परंतु रोजगार देण्याएवजी मोदींनी रोजगार हिरावून घेतले आहेत. आता आम्ही एका वर्षांत २२ लाख नोकऱ्या मिळवून देणार आहोत.'
आधी आमदारकीचा राजीनामा द्या : अशोक चव्हाण
'पक्षातील काही गद्दार लोक पक्षात असूनही शिवसेनेच्या प्रचारसभेला उपस्थित रहातात. त्या गद्दारांनी आधी पक्षामुळे मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, मग जिकडे जायचे तिकडे जावे,' असे आव्हान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. त्यांनी भाजपसोबत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली.
मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत: पृथ्वीराज चव्हाण
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. यंदा भाजपचा पराभव अटळ आहे. हे सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले . या सरकारमुळे आमच्या देशाचे ४२ जवानांचा हकनाक बळी गेला.
भाजपचं निर्लज्ज सरकार: छगन भुजबळ
भाजप सरकार निर्लज्ज सरकार आहे.... कर्जमाफी हा महाघोटाळा आहे... राम मंदिर करा अन्यथा आम्ही ते बांधू... पहारेकरी चोर आहेत हे सर्व म्हणणारे उद्धव ठाकरे आज त्यांच्या त्यांच्या मांडीला मांडी का लावून बसले आहेत ? मोदी नाशिकला आले व म्हणाले चंपा शष्टीला प्याज खातो...' मोदीजी आम्ही फक्त कांदेच खातो का? असं त्यांना विचारलं पाहिजे. 'योगी व मोदी का एकही नारा ना घर बसा हमरा ना बसने देंगे तुम्हारा '! असही भुजबळ म्हणाले.