म. टा. प्रतिनिधी, नगर
जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने धरणे भरली असून, गावा-गावांत नद्यांना पूर आला असल्याने दुष्काळ परिस्थिती हटली आहे. यंदा वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, तब्बल १२१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाच वर्षांत यंदा सर्वांधिक पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे खरिप हंगामातील बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.
सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा मान्सून जोरदार बरसत असून, पावसाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दहा दिवसांपूर्वीच पाऊस शंभर टक्के झाला होता. त्यात काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे २१ टक्कांनी वाढ झाली असून, रविवारी दिवसभर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच होता. रविवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण, मांडवगण या ठिकाणी ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीचे नोंद झाली आहे. दुष्काळी असलेल्या जामखेड, पारनेर, कर्जत या तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कर्जत तालुक्यांत राशिनला ७८ मिलिमीटर, भांबोऱ्याला ६५, माहीजळगावला ६५, जामखेड तालुक्यातील खर्डा येथे ७१ मिमी, नायगावला ७३ मिमी पाऊस झाला आहे. पारनेर तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पाऊस असला तरी मागील चोवीस तासांत येथे चांगला पाऊस होत आहे. पारनेरमधील सुपा महसूल मंडळात एका दिवसात ९० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
या वर्षी आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ६०२ मिमी म्हणजे १२१ टक्के पावसाची नोंद झाली असून, चौदा तालुक्यांपैकी ११ तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नेवासे व राहाता या तालुत्यांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. केवळ पारनेर तालुक्यात ६० टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यात आणखी पावसाची अपेक्षा आहे. पाच वर्षांत केवळ २०१३ मध्येच शंभर टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ११८ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती धुवून गेली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे, तलावे भरून वाहत आहेत.
चौकट ः
आता नुकसानीची चिंता
ऑगस्ट महिना वगळता यंदा सर्व महिन्यांत चांगला पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांममध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु हवामान विभागाने अतिवृष्टीच्या इशारा दिल्याने आता खरिप हंगामातील बाजरी, तूर व इतर पिकांच्या नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आणखी काही दिवस पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील पिकांच्या तयारीवर परिणाम होईल.
चौकट ः
गेल्या पाच वर्षांचा पाऊस
वर्ष वार्षिक सरासरी टक्के
२०१६ ६०२ (आतापर्यंत) १२१
२०१५ ३९२ ७९
२०१४ ३८२ ७७
२०१३ ५९१ ११८
२०१२ ३८३ ७७
जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने धरणे भरली असून, गावा-गावांत नद्यांना पूर आला असल्याने दुष्काळ परिस्थिती हटली आहे. यंदा वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, तब्बल १२१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाच वर्षांत यंदा सर्वांधिक पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे खरिप हंगामातील बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.
सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा मान्सून जोरदार बरसत असून, पावसाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दहा दिवसांपूर्वीच पाऊस शंभर टक्के झाला होता. त्यात काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे २१ टक्कांनी वाढ झाली असून, रविवारी दिवसभर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच होता. रविवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण, मांडवगण या ठिकाणी ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीचे नोंद झाली आहे. दुष्काळी असलेल्या जामखेड, पारनेर, कर्जत या तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कर्जत तालुक्यांत राशिनला ७८ मिलिमीटर, भांबोऱ्याला ६५, माहीजळगावला ६५, जामखेड तालुक्यातील खर्डा येथे ७१ मिमी, नायगावला ७३ मिमी पाऊस झाला आहे. पारनेर तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पाऊस असला तरी मागील चोवीस तासांत येथे चांगला पाऊस होत आहे. पारनेरमधील सुपा महसूल मंडळात एका दिवसात ९० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
या वर्षी आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ६०२ मिमी म्हणजे १२१ टक्के पावसाची नोंद झाली असून, चौदा तालुक्यांपैकी ११ तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नेवासे व राहाता या तालुत्यांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. केवळ पारनेर तालुक्यात ६० टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यात आणखी पावसाची अपेक्षा आहे. पाच वर्षांत केवळ २०१३ मध्येच शंभर टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ११८ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती धुवून गेली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे, तलावे भरून वाहत आहेत.
चौकट ः
आता नुकसानीची चिंता
ऑगस्ट महिना वगळता यंदा सर्व महिन्यांत चांगला पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांममध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु हवामान विभागाने अतिवृष्टीच्या इशारा दिल्याने आता खरिप हंगामातील बाजरी, तूर व इतर पिकांच्या नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आणखी काही दिवस पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील पिकांच्या तयारीवर परिणाम होईल.
चौकट ः
गेल्या पाच वर्षांचा पाऊस
वर्ष वार्षिक सरासरी टक्के
२०१६ ६०२ (आतापर्यंत) १२१
२०१५ ३९२ ७९
२०१४ ३८२ ७७
२०१३ ५९१ ११८
२०१२ ३८३ ७७