अ‍ॅपशहर

दुधाचे भाव कमी झाल्यास पुन्हा आंदोलन

'सरकारवर विश्वास ठेवून दूध संघांनी शेतकऱ्यांना वाढीव भाव दिला; मात्र, सरकारने कबूल केलेले अनुदान अद्याप दूध संघांना मिळालेले नाही. त्यामुळे दूध संघ एक ऑक्टोबरपासून दुधाचे भाव कमी करण्याच्या विचारात आहेत. तसे झाले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आंदोलन करील आणि एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही,' असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

Maharashtra Times 29 Sep 2018, 8:05 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raju-shetty


'सरकारवर विश्वास ठेवून दूध संघांनी शेतकऱ्यांना वाढीव भाव दिला; मात्र, सरकारने कबूल केलेले अनुदान अद्याप दूध संघांना मिळालेले नाही. त्यामुळे दूध संघ एक ऑक्टोबरपासून दुधाचे भाव कमी करण्याच्या विचारात आहेत. तसे झाले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आंदोलन करील आणि एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही,' असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

अकोले तालुक्यातील इंदोरी येथे आयोजित ऊस व दूध परिषदेत शेट्टी बोलत होते. शेतकरी नेते दशरथ सावंत अध्यक्षस्थानी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश पोपळे, युवा अध्यक्ष हंसराज वडगुले, महिला अध्यक्षा रसिका ढगे, विद्यार्थी उपाध्यक्षा शर्मिला यवले आदी या वेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, 'महाराष्ट्रात इतर कारखाने ऊस उत्पादकांना शेतकरी संघटनेने जाहीर केलेला भाव देतात; मात्र, नगर जिल्ह्यात साखर सम्राट उसाला सरकारने व संघटनेने ठरवून दिलेला भाव देत नाहीत, त्यामुळे ही ऊस परिषद अकोल्यात घेतली आहे. देशातील २०३ संघटना एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणारी दोन विधेयके तयार करण्यात आली आहेत. विशेष अधिवेशन बोलावून त्यांचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दिल्लीत आंदोलन केले जाणार आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज