नगर : रामभक्त हनुमानजी हे अनुसूचित जमातीचे अर्थात जनजातीचे असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी केला आहे. 'वाल्मीकी रामायण असेल किंवा तुलसी रामायण असेल, या सर्वांमध्ये हनुमान व प्रभू राम यांच्या सेनेतील इतर वीर योद्ध्यांच्या विषयी वानर, बंदर असाच उल्लेख आहे. याचा अर्थ ही सेना वानर सेना नव्हती, तर वानर हे त्यांचे गोत्र होते. हे गोत्र आजही जनजातीमध्ये पाहण्यास मिळतात. त्यामुळे रामभक्त हनुमान हे जमातीचेच आहेत,' असा निर्वाळा साय यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात नंदकुमार साय यांनी पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या जमिनींच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी आढावा बैठक घेतली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना साय म्हणाले, 'प्रभू रामचंद्राच्या रावणाबरोबर झालेल्या युद्धात वानर सेनाच हे रामाचे सैन्य होते. या सर्व सेनेचे 'वानर' हे गोत्र असून ते अनुसूचित जमाती अर्थात जनजातीचे आहे. त्यांची भाषा ही आदिवासी होती. रामसेनेतील सर्व वीर योद्धे हे जनजातीचे होते. आजही जनजातीमध्ये साक्षात 'हनुमान' गोत्रसुद्धा आहे. अशा पद्धतीने गोत्र कोणत्याही समाजामध्ये पाहण्यास मिळत नाही. यावरूनच हनुमानजी नेमके कोण होते, याचा अंदाज लावता येतो,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
.....
जिल्हाधिकारी कार्यालयात नंदकुमार साय यांनी पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या जमिनींच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी आढावा बैठक घेतली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना साय म्हणाले, 'प्रभू रामचंद्राच्या रावणाबरोबर झालेल्या युद्धात वानर सेनाच हे रामाचे सैन्य होते. या सर्व सेनेचे 'वानर' हे गोत्र असून ते अनुसूचित जमाती अर्थात जनजातीचे आहे. त्यांची भाषा ही आदिवासी होती. रामसेनेतील सर्व वीर योद्धे हे जनजातीचे होते. आजही जनजातीमध्ये साक्षात 'हनुमान' गोत्रसुद्धा आहे. अशा पद्धतीने गोत्र कोणत्याही समाजामध्ये पाहण्यास मिळत नाही. यावरूनच हनुमानजी नेमके कोण होते, याचा अंदाज लावता येतो,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
.....