अ‍ॅपशहर

रेशन दुकानदारांचा ‘बंद’चा इशारा

स्वस्त धान्य दुकानदार, परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांनी १ ऑगस्टपासून राज्यभरातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

Maharashtra Times 27 Jul 2016, 12:19 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ration shops declared strikes
रेशन दुकानदारांचा ‘बंद’चा इशारा


सरकार प्रलंबित मागण्यांचा विचार करत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार, परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांनी १ ऑगस्टपासून राज्यभरातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धान्य, रॉकेलचे वितरण बंद राहणार आहे.

याच महिन्यापासून रेशन दुकानांमध्ये तूरडाळ सरकार उपलब्ध करून देणार आहेत. त्यात आता या दुकानदारांना बंद पुकारला आहे. त्यामुळे गरिबांना स्वस्तात तूरडाळ मिळण्यात अडचण निर्माण होणार आहे.

धान्यवाटपाचे कमिशन वाढवून द्यावे, निमसरकारी नोकरीत समावून घ्यावे, यासह इतर मागण्या स्वस्त धान्य व रॉकेल विक्रेता संघाच्या आहेत. या मागण्यांसाठी गेल्या वर्षी मुंबईतील आझाद मैदानावर या संघाच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते. त्यात राज्यभरातील दुकानदार सहभागी झाले होते.

त्या वेळी दुकानदारांच्या शिष्टमंडळाने या खात्याचे मंत्री व प्रधान सचिव यांना भेटून निवेदन दिले होते. त्यावर चर्चा होऊन आश्वासन दिले होते. या मागण्यांसाठी वेळीवेळी सरकारला पत्र देऊन मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे १ ऑगस्टपासून या दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या मागण्या मान्य होईपर्यंत धान्य व केरोसीनचा साठा उचल करून वितरण करणार नाही, असा निर्णय राज्य फेडरेशनने घेतला असल्याची माहिती राज्याचे अध्यक्ष गजानन बाबर व जनरल सेक्रेटरी बाबूराव म्हमाणे यांनी केले आहे. ऑगस्ट महिन्यांपासून रेशनदुकानांमध्य़े सरकार कमी किमतीत तूरडाळ उपलब्ध करून देणार आहे. त्यात आता दुकानदारांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे डाळ वाटपामध्ये अडथळा निर्माण होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज