अ‍ॅपशहर

दुष्काळी तालुक्यांतील भूगर्भात मुबलक पाणी

समाधानकारक पाऊस आणि जलयुक्त शिवाराचे कामे याचा फायदा दुष्काळी तालुक्यांत दिसू लागला आहे. नगर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड या पाच तालुक्यांतील भूजल पातळी पाच वर्षांच्या सरासरी तुलनेत यंदा अडीच ते चार मीटरने वाढली असून, या भागात भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने अहवालात म्हटले आहे.

Maharashtra Times 27 Oct 2016, 3:00 am
नगर : समाधानकारक पाऊस आणि जलयुक्त शिवाराचे कामे याचा फायदा दुष्काळी तालुक्यांत दिसू लागला आहे. नगर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड या पाच तालुक्यांतील भूजल पातळी पाच वर्षांच्या सरासरी तुलनेत यंदा अडीच ते चार मीटरने वाढली असून, या भागात भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने अहवालात म्हटले आहे. दुष्काळी तालुक्यांत पाणीपातळी वाढली असली तरी उत्तरेतील कोपरगाव, राहाता, या तालुक्यांतील भूजल पातळीत कमी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rise in water level
दुष्काळी तालुक्यांतील भूगर्भात मुबलक पाणी


जिल्ह्यामध्ये यंदा ६७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत यंदा १३६ टक्के पाऊस झाला आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने भूजल सर्वेक्षणाचा विहिरींचा सर्वे करून भूजल पातळीचा अहवाल तयार केला आहे. कर्जत, जामखेड, नगर, पाथर्डी, शेवगाव या पाच तालुक्यांमध्ये या पावसाळ्यात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाऊस होता. तसेच या भागांत जलयुक्त शिवार अभियानामुळे बंधारे भरून जमिनीत पाणी मुरले आहे. या भागांत गेल्या दोन वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यंदा भूजल पातळीत वाढ झाल्याने या भागात पाण्याचा प्रश्न मिटला आहे. परंतु मुबलक पाणी असले तरी पाण्याचा अतिउपसा होऊन नये, यावर प्रशासनाला लक्ष ठेवावे लागणार आहे.

३८ गावांमध्ये पाणी टंचाई उद्भवू शकते
मुबलक पाऊस झाला असला तरी कोपरगाव, नगर, नेवासा, पारनेर, संगमनेर या तालुक्यांतील ३८ गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. पारनेर तालुक्यात कमी पाऊस झाल्यानंतर येथील तीन गावांमध्ये डिसेंबरपर्यंत पाणीटंचाई जाणवू शकतो. तर जानेवारी ते मार्च दरम्यान संगमनेरमधील एक व पारनेरमधील पाच असा सहा गावांमध्ये, तर एप्रिल ते जून २०१७ या दरम्यान कोपरगावमधील सहा, नगरमधील एक, नेवासामधील एक, पारनेरमधील १४ आणि संगमनेरमधील आठ अशा गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. गेल्या वर्षाच्या तुलनेत गावांची टंचाईची संख्या अल्प आहे.

तालुका वाढ (मीटरमध्ये)

नगर २.९०

पाथर्डी २.६०

शेवगाव ३.७०

जामखेड ४.४०

श्रीरामपूर २.७०

राहुरी २.६०

तालुका वाढ (मीटरमध्ये)

नेवासा २.६०

कर्जत २.९०

श्रीगोंदा २.९०

संगमनेर ३.२०

कोपरगाव ०.६०

राहाता १.६०

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज