म. टा. वृत्तसेवा, कर्जत
तालुक्यातील बाभूळगाव येथे बेकायदा सुरू असेलला वाळूउपसा रोखण्यासाठी ग्रामस्थांनी मातीचा भराव टाकून रस्ता बंद केला.
कर्जत तालुक्यात भिमा नदीच्या पात्रामध्ये राजरोस बेकायदा वाळूउपसा सुरू आहे. तो बंद करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत; मात्र, तो रोखण्यात प्रशासनाला यश येत नाही. अखेर हा वाळूउपसा रोखण्यासाठी तालुक्यातील शिंपोरा बाभूळगाव येथील ग्रामस्थांनी नदीपात्राकडे जाणार रस्ता मातीचा भराव टाकून बंद केला व वाळूचे ट्रक रोखले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बिभिषण गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थांनी ही उपाययोजना केली.
या संदर्भात गायकवाड यांनी सांगितले, ‘आमच्या परिसरामध्ये बेकायदा वाळूउपसा राजरोस सुरू आहे. आम्ही जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, राशिनचे पोलिस उपनिरीक्षक, मंडलनिरीक्षक, तलाठी या सर्वांना वांरवार कळवले आहे; मात्र, या बाबत कोणीच दखल घेत नाही. माहिती देऊनही अधिकारी नदीपात्राकडे येत नाहीत. यामुळे आमच्या गावाच्या परिसरात नदीपात्रामध्ये वाळू शिल्लक राहत नाही. वाळू राहत नसल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. नदीपात्रामध्ये पाणी शिल्लक राहत नाही. कधी सोलापूर जिल्ह्यातील तर कधी पुणे जिल्ह्यातील वाळू माफीया येतात व वाळूउपसा करून घेऊन जातात; मात्र, प्रशासनामधील काही अधिकाऱ्यांचे या माफियांशी विशेष जिव्हाळ्याचे संबंध असल्याने कारवाई होत नाही. उलट नागरिकांना धमकावले जाते. यामुळे आम्ही नदीपात्रकडे जाणारा रस्ता मातीचा भराव टाकून रोखला आहे; मात्र, अधिकाऱ्यांनीही याबाबत कडक धोरण स्वीकारून माफियांवर कारवाई करण्याची गरज आहे,’ असे गायकवाड यांनी सांगितले.
तालुक्यातील बाभूळगाव येथे बेकायदा सुरू असेलला वाळूउपसा रोखण्यासाठी ग्रामस्थांनी मातीचा भराव टाकून रस्ता बंद केला.
कर्जत तालुक्यात भिमा नदीच्या पात्रामध्ये राजरोस बेकायदा वाळूउपसा सुरू आहे. तो बंद करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत; मात्र, तो रोखण्यात प्रशासनाला यश येत नाही. अखेर हा वाळूउपसा रोखण्यासाठी तालुक्यातील शिंपोरा बाभूळगाव येथील ग्रामस्थांनी नदीपात्राकडे जाणार रस्ता मातीचा भराव टाकून बंद केला व वाळूचे ट्रक रोखले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बिभिषण गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थांनी ही उपाययोजना केली.
या संदर्भात गायकवाड यांनी सांगितले, ‘आमच्या परिसरामध्ये बेकायदा वाळूउपसा राजरोस सुरू आहे. आम्ही जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, राशिनचे पोलिस उपनिरीक्षक, मंडलनिरीक्षक, तलाठी या सर्वांना वांरवार कळवले आहे; मात्र, या बाबत कोणीच दखल घेत नाही. माहिती देऊनही अधिकारी नदीपात्राकडे येत नाहीत. यामुळे आमच्या गावाच्या परिसरात नदीपात्रामध्ये वाळू शिल्लक राहत नाही. वाळू राहत नसल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. नदीपात्रामध्ये पाणी शिल्लक राहत नाही. कधी सोलापूर जिल्ह्यातील तर कधी पुणे जिल्ह्यातील वाळू माफीया येतात व वाळूउपसा करून घेऊन जातात; मात्र, प्रशासनामधील काही अधिकाऱ्यांचे या माफियांशी विशेष जिव्हाळ्याचे संबंध असल्याने कारवाई होत नाही. उलट नागरिकांना धमकावले जाते. यामुळे आम्ही नदीपात्रकडे जाणारा रस्ता मातीचा भराव टाकून रोखला आहे; मात्र, अधिकाऱ्यांनीही याबाबत कडक धोरण स्वीकारून माफियांवर कारवाई करण्याची गरज आहे,’ असे गायकवाड यांनी सांगितले.