म. टा. प्रतिनिधी, नगर
दहा रुपयांची नाण्यांनी बाजारात व्यवहार करण्यास कोणत्याही अडचणी नसून ही नाणी बंद झाल्याची केवळ अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन विविध बँकांच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
नोटबंदीच्या निर्णयानंतर जिल्ह्यामध्ये चलन टंचाई निर्माण झाली होती. चलन टंचाईवर मात करण्यासाठी बँकांद्वारे पाच व दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात व्यवहारात आणली गेली. नोटबंदीमुळे सहजासहजी चलन उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांनी देखील ही नाणी बँकांकडून स्वीकारली. परंतु सध्या बाजारामध्ये दहा रुपयांची नाणी वापरून व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. दहा रुपयांची नाणी बंद झाल्याचे ग्राहकांना काही व्यापारांकडून सांगण्यात येत आहे. भाजीमार्केटमध्ये याचे प्रमाण जास्त असून यासर्व प्रकारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. यासंबंधी जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक आर. एम. दायमा यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले की, ‘दहा रुपयांचे नाणे बंद केल्याबाबत आरबीआय कडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवाच असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. या अफवांना बळी न पडता नागरिकांना व्यवहार करण्याची गरज आहे,’ असेही दायमा यांनी स्पष्ट केले. बँकांमध्येही दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेतून सांगण्यात आले असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दहा रुपयांची नाण्यांनी बाजारात व्यवहार करण्यास कोणत्याही अडचणी नसून ही नाणी बंद झाल्याची केवळ अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन विविध बँकांच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
नोटबंदीच्या निर्णयानंतर जिल्ह्यामध्ये चलन टंचाई निर्माण झाली होती. चलन टंचाईवर मात करण्यासाठी बँकांद्वारे पाच व दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात व्यवहारात आणली गेली. नोटबंदीमुळे सहजासहजी चलन उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांनी देखील ही नाणी बँकांकडून स्वीकारली. परंतु सध्या बाजारामध्ये दहा रुपयांची नाणी वापरून व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. दहा रुपयांची नाणी बंद झाल्याचे ग्राहकांना काही व्यापारांकडून सांगण्यात येत आहे. भाजीमार्केटमध्ये याचे प्रमाण जास्त असून यासर्व प्रकारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. यासंबंधी जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक आर. एम. दायमा यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले की, ‘दहा रुपयांचे नाणे बंद केल्याबाबत आरबीआय कडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवाच असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. या अफवांना बळी न पडता नागरिकांना व्यवहार करण्याची गरज आहे,’ असेही दायमा यांनी स्पष्ट केले. बँकांमध्येही दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेतून सांगण्यात आले असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.