अ‍ॅपशहर

हे तर हुकूमशाहीकडे पहिले पाऊल; 'या' मंत्र्याची मोदी सरकारवर जोरदार टीका

कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीत आज निघणारी 'ट्रॅक्टर परेड' दुर्दैवी असून त्यासाठी मोदी सरकार जबाबदार आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली.

Authored byसंदीप कुलकर्णी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2021, 4:41 pm
अहमदनगर: 'दोन तासात संसदेत कायदे मंजूर झाले, हे तर हुकूमशाहीकडे पहिले पाऊल आहे,' असा घणाघात ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारवर केला आहे. '१३० कोटींच्या या देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली निघणे हे दुर्दैवी आहे,' असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Narendra Modi


वाचा: संजय राऊत यांचे नावही 'त्या' यादीत होते, पण...

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आज, प्रजासत्ताक दिनी नगरच्या पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहण झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
मुश्रीफ म्हणाले, 'आज ६० दिवस झाले शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनादरम्यान सुमारे ५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. वास्तविक हे तिन्ही कायदे रद्द करून हा प्रश्न संपवला पाहिजे होता. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघणे, हे फार दुर्दैवी आहे. पंतप्रधानांनी हा प्रतिष्ठेचा किंवा अहंकाराचा प्रश्‍न न करता आंदोलन मिटवणे गरजेचे होते. कृषी कायद्यांना स्थगिती दिली, त्याऐवजी ते रद्द करायला पाहिजे होते व पुन्हा समजूत काढून ते करायचे होते. ते न करता केंद्र सरकारने हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.

वाचा: 'या' प्रश्नांची उत्तरं देशाला मिळणार आहेत का?: शिवसेना

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज