अहमदनगरः
श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अहमदनगरमध्ये झालेल्या सभेत धारदार वक्तव्य केलंय. 'खरे तर या धारकऱ्यांच्या हातात तलवारी असणं गरजेचं आहे. पण लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल', असं भिडे गुरुजी या सभेत म्हणाले.
भिडे गुरुजींची अहमदनगरच्या टिळक रोड येथे सभा झाली. आंबेडकरी संघटनांनी विरोध केल्याने कडक सुरक्षेत ही सभा पार पडली. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन उभारण्यात येणार आहे. या सिंहासनाच्या रक्षणासाठी 'हिंदवी स्वराज्य खडा पहारा' अशी तुकडी तयार केली जाणार आहे. यात दोन हजार धारकरी कार्यरत असतील, हे धारकरी रोज पहारा देतील, अशी माहिती भिडे गुरुजींनी दिली.
खरं तर सिंहासनाच्या रक्षणासाठी धारकऱ्यांच्या हाती तलवारी पाहिजेत. पण त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय सुरू आहे, अशी टीका होईल. यामुळे या ठिकाणी सध्यातरी धारकरी काठ्या घेऊन पहारा देतील. पण भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येईल, असं वक्तव्य भिडे गुरुजींनी केलं. अहमदनगर नंतर भिडे गुरुजींची नाशिकमध्ये सभा होणार आहे.
श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अहमदनगरमध्ये झालेल्या सभेत धारदार वक्तव्य केलंय. 'खरे तर या धारकऱ्यांच्या हातात तलवारी असणं गरजेचं आहे. पण लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल', असं भिडे गुरुजी या सभेत म्हणाले.
भिडे गुरुजींची अहमदनगरच्या टिळक रोड येथे सभा झाली. आंबेडकरी संघटनांनी विरोध केल्याने कडक सुरक्षेत ही सभा पार पडली. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन उभारण्यात येणार आहे. या सिंहासनाच्या रक्षणासाठी 'हिंदवी स्वराज्य खडा पहारा' अशी तुकडी तयार केली जाणार आहे. यात दोन हजार धारकरी कार्यरत असतील, हे धारकरी रोज पहारा देतील, अशी माहिती भिडे गुरुजींनी दिली.
खरं तर सिंहासनाच्या रक्षणासाठी धारकऱ्यांच्या हाती तलवारी पाहिजेत. पण त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय सुरू आहे, अशी टीका होईल. यामुळे या ठिकाणी सध्यातरी धारकरी काठ्या घेऊन पहारा देतील. पण भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येईल, असं वक्तव्य भिडे गुरुजींनी केलं. अहमदनगर नंतर भिडे गुरुजींची नाशिकमध्ये सभा होणार आहे.