अहमदनगर:
अस्मानी संकटातून केरळला बाहेर काढण्यासाठी देश-विदेशातून हजारो हात पुढे आले आहेत. त्यात गरीब आणि श्रीमंताचा समावेश आहेच. शिवाय देहविक्रय करून पोट भरणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश आहे. अहमदनगर येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या पुंजीतील २१ हजार रुपयांची आर्थिक रसद केरळ पूरग्रस्तांसाठी पाठवली आहे. विशेष म्हणजे या महिना अखेरपर्यंत एक लाख रुपये जमा करून ही रक्कम पूरग्रस्तांना पाठवण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.
देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या 'स्नेहालय' या स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी दीपक बुराम यांनी याबाबतची माहिती दिली. या महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे २१ हजाराचा धनादेश सुपूर्द केला असून हा धनादेश 'पंतप्रधान मदत निधी'त जमा करण्यात येणार आहे. या महिलांनी यापूर्वीही देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीचा हात पुढे केला होता.
डिसेंबर २०१५ मध्ये चेन्नईत महापूर आला होता. त्यावेळीही या महिलांनी पूरग्रस्तांसाठी १ लाखाची मदत दिली होती. गुजरातमधील भूकंप असो, त्सुनामी असो, काश्मीर आणि बिहारमधील पूर असो, महाराष्ट्रातील दुष्काळ असो की कारगील युद्ध. प्रत्येकवेळी या महिलांनी आर्थिक रसद पोहोचवली आहे. आतापर्यंत या महिलांनी संकटकाळात २७ लाखांची मदत केल्याचं बुराम यांनी सांगितलं.
अस्मानी संकटातून केरळला बाहेर काढण्यासाठी देश-विदेशातून हजारो हात पुढे आले आहेत. त्यात गरीब आणि श्रीमंताचा समावेश आहेच. शिवाय देहविक्रय करून पोट भरणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश आहे. अहमदनगर येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या पुंजीतील २१ हजार रुपयांची आर्थिक रसद केरळ पूरग्रस्तांसाठी पाठवली आहे. विशेष म्हणजे या महिना अखेरपर्यंत एक लाख रुपये जमा करून ही रक्कम पूरग्रस्तांना पाठवण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.
देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या 'स्नेहालय' या स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी दीपक बुराम यांनी याबाबतची माहिती दिली. या महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे २१ हजाराचा धनादेश सुपूर्द केला असून हा धनादेश 'पंतप्रधान मदत निधी'त जमा करण्यात येणार आहे. या महिलांनी यापूर्वीही देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीचा हात पुढे केला होता.
डिसेंबर २०१५ मध्ये चेन्नईत महापूर आला होता. त्यावेळीही या महिलांनी पूरग्रस्तांसाठी १ लाखाची मदत दिली होती. गुजरातमधील भूकंप असो, त्सुनामी असो, काश्मीर आणि बिहारमधील पूर असो, महाराष्ट्रातील दुष्काळ असो की कारगील युद्ध. प्रत्येकवेळी या महिलांनी आर्थिक रसद पोहोचवली आहे. आतापर्यंत या महिलांनी संकटकाळात २७ लाखांची मदत केल्याचं बुराम यांनी सांगितलं.