अ‍ॅपशहर

विक्रमवीर काळेंचे जंगी स्वागत

दुचाकीवर सलग चार दिवस प्रवास करून मुंबई-दिल्ली-कोलकाता व चेन्नई या चार महानगरांची सुवर्ण चतुष्कोन प्रदक्षिणा करणारे विक्रमवीर शरद काळे पाटील यांचे मंगळवारी सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.

Maharashtra Times 22 Mar 2017, 3:00 am
नगर ः दुचाकीवर सलग चार दिवस प्रवास करून मुंबई-दिल्ली-कोलकाता व चेन्नई या चार महानगरांची सुवर्ण चतुष्कोन प्रदक्षिणा करणारे विक्रमवीर शरद काळे पाटील यांचे मंगळवारी सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष शालिनीताई विखे व उपाध्यक्ष राजश्री घुले यांनीही काळेंना आवर्जून भेटून त्यांच्या साहसी मोहिमेचे कौतुक केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad kales warm welcome
विक्रमवीर काळेंचे जंगी स्वागत

१६ ते १९ मार्च असे चार दिवस सलग सुमारे ९० तास मोटारसायकलवर प्रवास करून काळे यांनी मुंबईहून दिल्ली, कोलकाता, चेन्नई व पुन्हा मुंबई अशी सुवर्ण चतुष्कोन प्रदक्षिणा पूर्ण केली. सुमारे सहा हजार किलोमीटरच्या या प्रवासात तब्बल १३ राज्यांची परिक्रमा त्यांनी केली. त्यांना ‘टफेस्ट रायडर’ किताब मिळाला आहे. यावेळी अहमदनगर टुरिझम फोरमचे प्रवर्तक किशोर मरकड, गोवर्धन अपार्टमेंटचे रहिवासी वसंत लुणिया, संदीप गुजराथी तसेच प्रा. संजय टेमक, डॉ. दादासाहेब शिंदे, गणेश औटी, नितीन मरकड, संपत कडू, शिरीष पाटील, सोमनाथ खाडे, सुरेश भुस्सा, दत्तात्रय येनगुल, प्रा. राजेंद्र थोरात, सुमित देवतरसे, सारंग शेलार, रवींद्र अभंग, प्रा. रवी राऊत, संजय स्वामी, बिपीन कुरी आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज