म. टा. प्रतिनिधी, नगर
लोकसभेच्या मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा शिर्डी मतदारसंघात मतदान घटले. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार या मतदारसंघात सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. शिर्डीसाठीच्या यंदाच्या मतदान प्रक्रियेत कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, संगमनेरमधील एक व नेवासा तालुक्यातील दोन अशा एकूण तीन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. दरम्यान, नगर मतदारसंघाच्या निवडणुकीप्रमाणेच शिर्डी मतदारसंघातसुद्धा प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असताना चारशेवर मतदानयंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चुरशीची झाली. युतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे, अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे या तीन तुल्यबळ उमेदवारांसह २० जण रिंगणात होते. या मतदारसंघात एकूण १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार होते. त्यापैकी ६२ टक्के मतदारांनी म्हणजेच जवळपास नऊ लाख ८० हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ च्या निवडणुकीत १४ लाख ४७ हजार ४२९ मतदारांपैकी सुमारे ९ लाख ३२ हजार (सुमारे ६४.४५ टक्के) मतदारांनी मतदान केले होते. या तुलनेत यंदाचे मतदान सुमारे दोन टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळेच या घटलेल्या मतदानाचा काय परिणाम होतो, याची उत्सुकता असली, तरी २३ मे रोजी मतमोजणीनंतरच ती संपुष्टात येणार आहे.
तीन गावांचा बहिष्कार
संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी येथील ग्रामस्थांनी गावात मूलभूत सोयीसुविधा न केल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला होता, तरनेवासा तालुक्यातील बहिरवाडी व धामोरी या दोन गावातील ग्रामस्थांनी महावितरणमधील कंत्राटी कामगाराच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणी ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
अन्यत्र मतदान शांततेत
नेवासा व संगमनेर येथील प्रकार वगळता शिर्डी मतदारसंघातील इतर सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. या मतदारसंघात सोशल मीडियावर मतदान केंद्रावरील ईव्हीएमचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी असतानादेखील सर्रास मोबाइल नेले जात असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत आता प्रशासन काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.
लोकसभेच्या मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा शिर्डी मतदारसंघात मतदान घटले. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार या मतदारसंघात सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. शिर्डीसाठीच्या यंदाच्या मतदान प्रक्रियेत कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, संगमनेरमधील एक व नेवासा तालुक्यातील दोन अशा एकूण तीन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. दरम्यान, नगर मतदारसंघाच्या निवडणुकीप्रमाणेच शिर्डी मतदारसंघातसुद्धा प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असताना चारशेवर मतदानयंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चुरशीची झाली. युतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे, अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे या तीन तुल्यबळ उमेदवारांसह २० जण रिंगणात होते. या मतदारसंघात एकूण १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार होते. त्यापैकी ६२ टक्के मतदारांनी म्हणजेच जवळपास नऊ लाख ८० हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ च्या निवडणुकीत १४ लाख ४७ हजार ४२९ मतदारांपैकी सुमारे ९ लाख ३२ हजार (सुमारे ६४.४५ टक्के) मतदारांनी मतदान केले होते. या तुलनेत यंदाचे मतदान सुमारे दोन टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळेच या घटलेल्या मतदानाचा काय परिणाम होतो, याची उत्सुकता असली, तरी २३ मे रोजी मतमोजणीनंतरच ती संपुष्टात येणार आहे.
तीन गावांचा बहिष्कार
संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी येथील ग्रामस्थांनी गावात मूलभूत सोयीसुविधा न केल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला होता, तरनेवासा तालुक्यातील बहिरवाडी व धामोरी या दोन गावातील ग्रामस्थांनी महावितरणमधील कंत्राटी कामगाराच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणी ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
अन्यत्र मतदान शांततेत
नेवासा व संगमनेर येथील प्रकार वगळता शिर्डी मतदारसंघातील इतर सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. या मतदारसंघात सोशल मीडियावर मतदान केंद्रावरील ईव्हीएमचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी असतानादेखील सर्रास मोबाइल नेले जात असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत आता प्रशासन काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.