म. टा. वृत्तसेवा, पाथर्डी
शिवसेनेचे बोट धरून वाढलेल्या भाजपने सेनेच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम केले असल्याने राज्य भाजप मुक्त करण्यासाठी आता शिवसैनिकांनी अधिक जोमाने कामास लागावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय घाडी यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून येथील गोरे मंगल कार्यालयात शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, घनशाम शेलार, विजय पाटील, शिवाजी मचे, उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, तालुका प्रमुख रफिक शेख, अविनाश मगरे, बाबासाहेब ढाकणे, भगवान दराडे, नवनाथ चव्हाण, शहरप्रमुख भाऊसाहेब धस, गणेश रांधवणे, आपा सातपुते, अनिल फुंदे, भरत लोहकरे, अशोक कोटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना घाडी म्हणाले की, आजची भाजप पाहून स्व. मुंडे यांना स्वर्गात सुद्धा वाईट वाटत असेल. सोन्या सारखी असलेली मुंडे व सेनाप्रमुखांसारखी माणसे आज हयात नसल्याने भाजपला मस्ती चढली आहे. जय जवान, जय किसान असा नारा आपण देतो. मात्र, आज जवान व किसान दोघेही मरत असतांना नरेंद्र मोदी हे गुपचूप पाकमध्ये जाऊन नवाज शरीफ यांना भेटतात. शिवसेनेने केलेल्या मागणीमुळेच शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचे भाजपला मान्य करावे लागत असल्याने शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली मात्र ती पुरेशी देण्यात भाजपने हात आखडता घेतला. मागील निवडणुकीत एन वेळी भाजपने फसवल्याने आता कोणत्याही परिस्थिती मध्ये स्वबळावर निवडणूक करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला असून राज्य सुजलाम सुफलाम करायचे असल्याने आता घरा घरात सेना नेण्याचे काम आपल्या सर्वाना करायचे आहे. ही आपली अखेरची लढाई असून मागील वेळेस मोदी यांच्या थापांवर आपण विश्वास ठेऊन मते दिली. मात्र उद्धव ठाकरे हे जे बोलतात ते करून दाखवत असल्याने आता सेनेच्या मागे खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
फोटो
शिवसेनेचे बोट धरून वाढलेल्या भाजपने सेनेच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम केले असल्याने राज्य भाजप मुक्त करण्यासाठी आता शिवसैनिकांनी अधिक जोमाने कामास लागावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय घाडी यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून येथील गोरे मंगल कार्यालयात शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, घनशाम शेलार, विजय पाटील, शिवाजी मचे, उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, तालुका प्रमुख रफिक शेख, अविनाश मगरे, बाबासाहेब ढाकणे, भगवान दराडे, नवनाथ चव्हाण, शहरप्रमुख भाऊसाहेब धस, गणेश रांधवणे, आपा सातपुते, अनिल फुंदे, भरत लोहकरे, अशोक कोटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना घाडी म्हणाले की, आजची भाजप पाहून स्व. मुंडे यांना स्वर्गात सुद्धा वाईट वाटत असेल. सोन्या सारखी असलेली मुंडे व सेनाप्रमुखांसारखी माणसे आज हयात नसल्याने भाजपला मस्ती चढली आहे. जय जवान, जय किसान असा नारा आपण देतो. मात्र, आज जवान व किसान दोघेही मरत असतांना नरेंद्र मोदी हे गुपचूप पाकमध्ये जाऊन नवाज शरीफ यांना भेटतात. शिवसेनेने केलेल्या मागणीमुळेच शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचे भाजपला मान्य करावे लागत असल्याने शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली मात्र ती पुरेशी देण्यात भाजपने हात आखडता घेतला. मागील निवडणुकीत एन वेळी भाजपने फसवल्याने आता कोणत्याही परिस्थिती मध्ये स्वबळावर निवडणूक करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला असून राज्य सुजलाम सुफलाम करायचे असल्याने आता घरा घरात सेना नेण्याचे काम आपल्या सर्वाना करायचे आहे. ही आपली अखेरची लढाई असून मागील वेळेस मोदी यांच्या थापांवर आपण विश्वास ठेऊन मते दिली. मात्र उद्धव ठाकरे हे जे बोलतात ते करून दाखवत असल्याने आता सेनेच्या मागे खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
फोटो