अ‍ॅपशहर

राज्यपालांनी संविधानाची शपथ घेतली नाही का? माजी मंत्र्याचा सवाल

खोतकर हे आज नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी राज्यात मंदिर उघडण्यासाठी भाजपने केलेल्या आंदोलनावर बोलताना राज्यातील भाजप नेत्यांवर तोफ डागली

Authored byसंदीप कुलकर्णी | Edited byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2020, 4:12 pm
म.टा. प्रतिनिधी, नगर: 'भावनिक गोष्टींना हात घालायचा व लोकांना भडकावायचे, राज्यामध्ये द्वेषाचे राजकारण करायचे ही भाजपची पद्धतच आहे,' असा घणाघाती आरोप शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपवर केला आहे. 'भाजपवाल्यांना मंदिराचे काही देणे घेणे नाही. त्यांना केवळ फक्त लोकांच्या भावना भडकावून त्यातून आपली पोळी साध्य करून घ्यायची आहे,' असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhagatsingh koshyari


खोतकर हे आज नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी राज्यात मंदिर उघडण्यासाठी भाजपने केलेल्या आंदोलनावर बोलताना राज्यातील भाजप नेत्यांवर तोफ डागली. ते म्हणाले, 'मंदिर उघडण्याबाबत जी मागणी आमच्या पूर्वीच्या मित्र पक्षाकडून होत आहे, ती मागणी हास्यास्पद आहे. कारण राज्यात करोनाची तिव्रता अजूनही आहे. राज्यांमध्ये मृत्यूचा दर म्हणावा तसा कमी झालेला नाही. पण फक्त कोणत्याही बाबीमध्ये भाजपला राजकारण करायचे आहे. भावनिक गोष्टींना हात घालायचा व लोकांना भडकावयाचे आणि द्वेषाचे राजकारण करायचे, अशी भाजपची पद्धत आहे. मंदिर हा विषय हातात घेतला तर सर्वसामान्य माणसे आपल्या बाजूने उभी राहतील , मग सर्वसामान्य माणसे मेली तरी चालतील , पण त्यांच्याशी यांना काही घेणे देणे नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार भाजप वाल्यांचा आहे,' असा टोलाही त्यांनी लगावला. 'राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे समर्थपणे राज्यामध्ये काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे, हे ठरवतात व राबवतात,' असेही ते म्हणाले.

वाचाः मनपा आयुक्तांना मंत्रालयात परत पाठवा; मुंबई महापौरांचा पालिकेत ठिय्या

राज्यपालांनी संविधानाची शपथ घेतली नाही का?

माजी मंत्री खोतकर यांनी यावेळी मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यात मंदिर उघडण्यावरून झालेल्या पत्रव्यवहारावर सुद्धा भाष्य केले. ते म्हणाले, 'गेल्या पस्तीस वर्षे मी विधिमंडळाच्या राजकारणात आहे. आतापर्यंतच्या राज्यपालांनी अशाप्रकारचे विधान केले, हे मला तरी आठवत नाही. राज्यपालांना संविधान मान्य नाही का ? त्यांनी शपथ घेताना संविधानाची शपथ घेतली नाही का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 'राज्यपालाच्या खुर्चीवरून अशा प्रकारचा जातिवाद किंवा भेदभाव केला जात असेल तर हे जनतेने व राज्याने पाहिलेले पहिलेच उदाहरण आहे,' असेही खोतकर म्हणाले.

वाचाः आदित्य ठाकरेंकडून मेट्रो कारशेडच्या नव्या जागेची पाहणी; केलं हे ट्विट

वाचाः तर प्रमाणपत्राची गरज भासते; अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज