अ‍ॅपशहर

निभर्या: प्रत्यक्ष फाशीपर्यंत अण्णा हजारेंचे मौन कायम

'निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना प्रत्यक्ष फाशी झाल्याशिवाय मौन सोडणार नाही,' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले असून, यामुळे न्यायव्यवस्थेवरील वि‌श्वास दृढ होण्यास मदत होईल, असेही हजारे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 8 Jan 2020, 8:49 am
नगर : 'निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना प्रत्यक्ष फाशी झाल्याशिवाय मौन सोडणार नाही,' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले असून, यामुळे न्यायव्यवस्थेवरील वि‌श्वास दृढ होण्यास मदत होईल, असेही हजारे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anna-hazare


हजारे यांचे २० डिसेंबरपासून राळेगण सिद्धीत मौन सुरू आहे. त्यांची प्रमुख मागणी निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांच्या फाशीच्या अंमलबजावणीची आहे. आपल्या लिखित प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, 'आपल्या देशाची राज्यघटना सर्वोच्च स्थानी आहे. त्याच्या आधारे कायदे होतात व कायद्याच्या आधारे देश चालतो. निर्भया प्रकरणात न्यायालयाने २०१३ मध्ये आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती; त्यानंतर सात वर्षांचा प्रदीर्घ काळ गेला, तरीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे देशातील जनतेच्या मनात अविश्वास निर्माण झाला होता. आज न्यायालयाने गुन्हेगारांच्या फाशीचे वॉरंट जारी केल्याने जनतेच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण होईल.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज