म. टा. प्रतिनिधी, नगर
राज्य सरकारच्या स्मार्ट ग्राम योजनेत निवड झालेल्या जिल्ह्यातील चौदा गावांना पुरस्काराची रक्कम मिळाली असली तरी यातून कोणती कामे घ्यायची याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. काही गावांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, आरओ प्लांट यांसारखी कामे जिल्हा परिषदेला सुचविली आहेत. जिल्हा परिषदेने मात्र राज्य सरकारकडून आणखी कामे सुचविली जाणार असल्याचे या गावांना कळवले आहे. त्यामुळे गावात अद्याप कामे सुरू झाली नसल्याने पुरस्काराची रक्कम खात्यात पडून आहे.
आमदार आदर्श ग्राम योजनेच्या धरतीवर ग्रामविकास विभागाने स्मार्ट ग्राम योजना सुरू केली. या योजनेत पहिल्या वर्षात जिल्ह्यातील चौदा गावांची निवड करण्यात आली आहे. मागील ऑक्टोबर महिन्यात या गावांना पुरस्काराची रक्कम देण्यात आली. या पुरस्काराच्या रकमेतून कोणती कामे घ्यायची याची यादी राज्य सरकारने योजना सुरू करतानाच दिलेली आहे. त्यामध्ये काही कामे नंतर सुचविली जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले होते. सरकारच्या या निर्णयानुसार काही गावांनी आरओ प्लांट, जलशुद्धीकरण यंत्रणा, सांडपाणी व्यवस्थापन ही कामे घेण्याचे नियोजन जिल्हा परिषदेला कळवले आहे. जिल्हा परिषदेने मात्र यावर अद्याप काही प्रतिसाद दिलेला नाही. राज्य सरकारच्या नवीन कामांच्या यादीची वाट पाहिली जात आहे.
चौकट ः
उर्वरित रक्कम लवकरच गावांना देणार
ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद सभागृहात सर्वसाधारण सभेत स्मार्ट गावांना पुरस्काराच्या रकमेचे चेक देण्यात आले. पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपये असताना प्रत्यक्षात मात्र साडेआठ लाख रुपयेच देण्यात आले. यावर काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर उर्वरित रक्कम थोड्याच दिवसांत देणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासही आता दीड महिना उलटून गेला तरीही पुरस्काराचे उर्वरित दीड लाख रुपये गावांना मिळालेले नाही. राज्य सरकारने पुरस्काराची पूर्ण रक्कम दिली असतानाही गावांना अद्याप पूर्ण रक्कम मिळाली नाही. पुरस्कारांची उर्वरित रक्कम लवकर गावांना दिली जाणार असल्याचे ग्रामपंचायत विभागातून सांगण्यात आले.
चौकट ः
निवड झालेली स्मार्ट गावे
नवलेवाडी, साकूर, डाऊच बुद्रुक, लोणी बुद्रुक, शिरसगाव, कुरणवाडी, नजीक चिंचोली, अमरापूर, पारेवाडी, दिघोळ, मांदळी, आर्वी अनगरे, रेनवडी, हिवरे बाजार.
राज्य सरकारच्या स्मार्ट ग्राम योजनेत निवड झालेल्या जिल्ह्यातील चौदा गावांना पुरस्काराची रक्कम मिळाली असली तरी यातून कोणती कामे घ्यायची याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. काही गावांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, आरओ प्लांट यांसारखी कामे जिल्हा परिषदेला सुचविली आहेत. जिल्हा परिषदेने मात्र राज्य सरकारकडून आणखी कामे सुचविली जाणार असल्याचे या गावांना कळवले आहे. त्यामुळे गावात अद्याप कामे सुरू झाली नसल्याने पुरस्काराची रक्कम खात्यात पडून आहे.
आमदार आदर्श ग्राम योजनेच्या धरतीवर ग्रामविकास विभागाने स्मार्ट ग्राम योजना सुरू केली. या योजनेत पहिल्या वर्षात जिल्ह्यातील चौदा गावांची निवड करण्यात आली आहे. मागील ऑक्टोबर महिन्यात या गावांना पुरस्काराची रक्कम देण्यात आली. या पुरस्काराच्या रकमेतून कोणती कामे घ्यायची याची यादी राज्य सरकारने योजना सुरू करतानाच दिलेली आहे. त्यामध्ये काही कामे नंतर सुचविली जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले होते. सरकारच्या या निर्णयानुसार काही गावांनी आरओ प्लांट, जलशुद्धीकरण यंत्रणा, सांडपाणी व्यवस्थापन ही कामे घेण्याचे नियोजन जिल्हा परिषदेला कळवले आहे. जिल्हा परिषदेने मात्र यावर अद्याप काही प्रतिसाद दिलेला नाही. राज्य सरकारच्या नवीन कामांच्या यादीची वाट पाहिली जात आहे.
चौकट ः
उर्वरित रक्कम लवकरच गावांना देणार
ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद सभागृहात सर्वसाधारण सभेत स्मार्ट गावांना पुरस्काराच्या रकमेचे चेक देण्यात आले. पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपये असताना प्रत्यक्षात मात्र साडेआठ लाख रुपयेच देण्यात आले. यावर काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर उर्वरित रक्कम थोड्याच दिवसांत देणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासही आता दीड महिना उलटून गेला तरीही पुरस्काराचे उर्वरित दीड लाख रुपये गावांना मिळालेले नाही. राज्य सरकारने पुरस्काराची पूर्ण रक्कम दिली असतानाही गावांना अद्याप पूर्ण रक्कम मिळाली नाही. पुरस्कारांची उर्वरित रक्कम लवकर गावांना दिली जाणार असल्याचे ग्रामपंचायत विभागातून सांगण्यात आले.
चौकट ः
निवड झालेली स्मार्ट गावे
नवलेवाडी, साकूर, डाऊच बुद्रुक, लोणी बुद्रुक, शिरसगाव, कुरणवाडी, नजीक चिंचोली, अमरापूर, पारेवाडी, दिघोळ, मांदळी, आर्वी अनगरे, रेनवडी, हिवरे बाजार.