अ‍ॅपशहर

मूल्याधारित सामाजिक काम अडचणीत

‘समाजकार्य आजकाल कॉर्पोरेट होताना दिसत आहे. निधी असेल तर सामाजिक काम अशी स्थिती आहे. या कॉर्पोरेट सोशल कामामुळे मूल्याधारित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे व्यक्त होणे कठीण झाले आहे. व्यवस्थेला विरोध करणे लांबच राहिले, पण साधा निषेध व्यक्त करणेही अवघड झाले असून, हे वातावरण बदलण्याचे काम मूल्याधारित काम करणारांना करावे लागणार आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी येथे केले.

Maharashtra Times 23 May 2017, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम social worker felicitate
मूल्याधारित सामाजिक काम अडचणीत


‘समाजकार्य आजकाल कॉर्पोरेट होताना दिसत आहे. निधी असेल तर सामाजिक काम अशी स्थिती आहे. या कॉर्पोरेट सोशल कामामुळे मूल्याधारित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे व्यक्त होणे कठीण झाले आहे. व्यवस्थेला विरोध करणे लांबच राहिले, पण साधा निषेध व्यक्त करणेही अवघड झाले असून, हे वातावरण बदलण्याचे काम मूल्याधारित काम करणारांना करावे लागणार आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी येथे केले.

अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त येथील रहेमत सुलतान फाउंडेशनच्या पुढाकाराने अहमदनगर कन्या पुरस्कारांचे वितरण मोघे यांच्या हस्ते येथे करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पत्नींचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला. शहेनाज सय्यद, ज्योत्स्ना कदम, शमीम खान, उज्वला वाकळे, कल्पना बुलबुले, रेश्मा खान, शकुंतला लोखंडे, यशोधरा बनसोडे, यास्मिन शेख, शालन वडवणीकर, हेमलता बोरुडे, डॉ. शमा फारुकी, वर्षा कुसळकर या महिलांना हा पुरस्कार दिला गेला. यावेळी प्राचार्य शिवाजीराव देवढे, स्मिता पानसरे, पोलीस उपनिरीक्षक शिरदावडे, संस्थेचे अध्यक्ष युनूस तांबटकर, सचिव एजाज खान आदी उपस्थित होते.

समाजातल्या शोषित, उपेक्षित व दुर्लक्षितांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सोबत जीवनसाथी म्हणून जगणे म्हणजे पदरात निखारा घेवून संसार करण्यासारखेच आहे. हे सहन करणाऱ्या सावित्रीच्या लेकींना अहमदनगर कन्या पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे विविध संस्था व संघटनांच्यावतीने केलेला सलाम आहे, असे गौरवोदगार मोघे यांनी यावेळी व्यक्त केले. अहमदनगर कन्या पुरस्कार म्हणजे कुटुंबाचा कणा असलेल्या महिलेचा सन्मान असल्याची भावना स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली. पुरस्कारर्थी महिलांनी व त्यांच्या पतींनी आपल्यासमोर सावित्रीबाई व जोतिबा फुले या जोडप्याचे जीवन आदर्श म्हणून ठेवण्याचे आवाहन प्राचार्य देवढे यांनी यावेळी केले. पुरस्कार विजेत्या डॉ. शमा फारुकी आणि कल्पना बुलबुले यांनी अहमदनगर कन्या पुरस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे यांना समर्पित केला. स्वागत एजाज खान यांनी केले व प्रास्ताविक युनूस तांबटकर यांनी केले. सूत्रसंचालन शिवानी शिंगवी व आदित्य वडवणीकर यांनी केले तर आभार तारिक शेख यांनी मानले. कार्यक्रमासाठी आबिद खान, संध्या मेढे, शफाकत सय्यद, नादिर खान, तिरमलेश पासकंटी यांनी परिश्रम घेतले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज