अहमदनगरः शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन सरत्या वर्षाला निरोप देत, नवीन वर्षातील शुभ कामनेचा संकल्प घेत अनेक बॉलीवुड आणि टॉलीवुडमधील कलाकार शिर्डीला भेट देतायेत. अभिनेत्री राणी मुखर्जी, दक्षिणीतेली स्टार मोहन बाबू, अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांनी नुकतेच साईबाबांचे दर्शन घेतले होते. आता अभिनेता सोनू सुदने देखील आज साईबाबांच्या समाधीच दर्शन घेत आपल्या कुटुबीयांसोबतच जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजालाही चांगले दिवस यावेत, अशी मनोकामना साई चरणी केली आहे.
शिर्डीत साईंच्या चरणी लीन होत, आपल्या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार येत असतात. मात्र, सरत्या वर्षाला निरोप देताना डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात साईंच्या दर्शनासाठी कलाकारांची रीघ लागल्याचे चित्र आहे. गेल्याच आठवड्यात राणी मुखर्जीने शिर्डात येऊन साई समाधीचे दर्शन घेतले होते. तर, रविवारी स्टार मोहन बाबु आणि त्याची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आपल्या मुलांसह शिर्डीला येऊन साई चरणी नतमस्तक झाले होते.
३१ डिसेंबरला साईबाबांचे मंदिर रात्रभर खुले राहणार
साईभक्त असलेल्या सोनू सुदचेही नविन वर्षात काही चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे आज सरत्या वर्षाच्या एक दिवस आधी त्याने साई दरबारी हजेरी लावली आहे. आगामी वर्षात येणाऱ्या चित्रपटांच्या यशाची कामना सोनू सुदने केलीये. आपल्या कुटुबीयांसोबतच देशातील शेतकऱ्यांनाही चांगले दिवस येवोत, त्यांना पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागू नये, ही प्रार्थनाही त्याने साई चरणी केली.
शिर्डीत साईंच्या चरणी लीन होत, आपल्या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार येत असतात. मात्र, सरत्या वर्षाला निरोप देताना डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात साईंच्या दर्शनासाठी कलाकारांची रीघ लागल्याचे चित्र आहे. गेल्याच आठवड्यात राणी मुखर्जीने शिर्डात येऊन साई समाधीचे दर्शन घेतले होते. तर, रविवारी स्टार मोहन बाबु आणि त्याची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आपल्या मुलांसह शिर्डीला येऊन साई चरणी नतमस्तक झाले होते.
३१ डिसेंबरला साईबाबांचे मंदिर रात्रभर खुले राहणार
साईभक्त असलेल्या सोनू सुदचेही नविन वर्षात काही चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे आज सरत्या वर्षाच्या एक दिवस आधी त्याने साई दरबारी हजेरी लावली आहे. आगामी वर्षात येणाऱ्या चित्रपटांच्या यशाची कामना सोनू सुदने केलीये. आपल्या कुटुबीयांसोबतच देशातील शेतकऱ्यांनाही चांगले दिवस येवोत, त्यांना पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागू नये, ही प्रार्थनाही त्याने साई चरणी केली.