अहमदनगर : राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाला २ महिने उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, तसंच एसटी कर्मचारीही तणावाखाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला पत्र लिहून आपल्या वेदना मांडल्या आहेत. तसंच सरकारकडे स्वेइच्छा मरणासाठी परवानगी मागितली आहे. (St Bus Strike Latest News) 'संपाच्या काळात ६७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आमच्याही मनात सतत आत्महत्येचा विचार येत आहे. मात्र, आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे सरकारनेच आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी,' अशी मागणी पाथर्डी येथील एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
पाथर्डी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी पाथर्डीच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांसाठी लक्ष घालावं. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात यावी, मागण्या पूर्ण करता येत नसतील तर आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी तरी द्यावी, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, एसटी कामगारांच्या संपाला ६० दिवस झाले आहेत. तरीही संप मिटलेले नाही. दुसरीकडे संप मोडून काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तर सरकारने दिलेले प्रस्ताव आणि पगारवाढीची केलेली अंमलबजावणी कर्मचाऱ्यांना मान्य झालेली नाही.
'आम्ही सतत तणावाखाली...'
'एसटी कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही. आम्ही सतत तणावाखाली वावरत आहोत. राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचारी यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन तसंच इतर प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे ६७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तशीच मनस्थिती आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचीही आहे. आमच्याही मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येत आहे. परंतु आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळे स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी,' अशा शब्दांत एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून आपल्या वेदना मांडल्या आहेत.
पाथर्डी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी पाथर्डीच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांसाठी लक्ष घालावं. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात यावी, मागण्या पूर्ण करता येत नसतील तर आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी तरी द्यावी, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, एसटी कामगारांच्या संपाला ६० दिवस झाले आहेत. तरीही संप मिटलेले नाही. दुसरीकडे संप मोडून काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तर सरकारने दिलेले प्रस्ताव आणि पगारवाढीची केलेली अंमलबजावणी कर्मचाऱ्यांना मान्य झालेली नाही.
'आम्ही सतत तणावाखाली...'
'एसटी कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही. आम्ही सतत तणावाखाली वावरत आहोत. राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचारी यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन तसंच इतर प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे ६७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तशीच मनस्थिती आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचीही आहे. आमच्याही मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येत आहे. परंतु आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळे स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी,' अशा शब्दांत एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून आपल्या वेदना मांडल्या आहेत.